शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

प्रशासनात चालढकल चालणार नाही

By admin | Updated: June 3, 2015 02:15 IST

यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, ...

आशुतोष सलील : जलयुक्त शिवार अभियानाचा आढावावर्धा : यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, कुणी करायची आणि किती दिवसांत करायची, हे नियोजित असायला हवे. यापुढे केवळ कागदावरील कामे चालणार नाही. जमत नसेल तर तेसुद्धा सांगा, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जलयुक्त शिवार अभियानातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.जिल्हाधिकारी सलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांमध्ये असलेला असमन्वय चांगलाच खटकल्याचे समजते. याप्रसंगी जलयुक्त शिवारची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना २१४ गावांत प्रशासकीय मान्यता दिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिलेत. बैठकीला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच समितीचे सदस्य माधव कोटस्थाने प्रामुख्याने उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात राज्य जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे २ हजार २७२ कामे घेण्यात येणार आहे. १ हजार ७३६ कामे पूर्ण झाली तर ५३६ कामे प्रगतिपथावर आहेत. गावनिहाय सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या जलसंधारणाच्या कामांबाबत संपूर्ण माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्यात. शिवाय संपूर्ण विभागाची माहिती संकलनामध्ये समानता असावी, अशी सूचना करण्यासही ते विसरले नाहीत.(जिल्हा प्रतिनिधी)गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचे निर्देशजलयुक्त शिवार अभियानात तालुका तसेच जिल्हास्तरावर समितीचे गठण करून या समितीमार्फत जिल्ह्यातील संपूर्ण कामांची एकत्रित माहिती सादर करावी, अशी सूचना करताना या अभियानासाठी ४५ कोटी ६८ लाखांचा निधी प्राप्त झाला असून यात विशेष अनुदान जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधूनही निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता त्रयस्त संस्थेमार्फत तपास व मूल्यमापन करण्यासाठी संस्थेची नियुक्ती त्वरित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.जलयुक्त शिवार अभियानात राज्य जलसंधारण विभागात ७० कामे प्रस्तावित करण्यात आली असून केवळ २५ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे येत्या दोन दिवसात सुरू करावीत, अशा कडक शब्दात सूचनाही त्यांनी दिल्यात.जि.प. लघुसिंचन विभागातर्फे साखळी सिमेंट नालाबांधची १०७ कामे घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण व ढाळीचे बांध, अशी ३०८ कामे, वनविभागाची ८३ कामे, पाणी पुरवठा विभागाच्या ७७ कामांना विशेष निधीतून मान्यता देण्यात आली आहे. सिंचन विभागाच्या ठिबक व तुषार सिंचनाच्या ११६० कामांचाही कार्यक्रमात समावेश आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागातर्फे भूमिगत सिमेंट बंधारा, नाला ट्रेंच तसेच रिचार्ज शाफ्टची ४८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. लोकसहभागातून तसेच सीएसआर फंडातून जिल्ह्यात अधिकाधिक कामे पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.