शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रशासनात चालढकल चालणार नाही

By admin | Updated: June 3, 2015 02:15 IST

यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, ...

आशुतोष सलील : जलयुक्त शिवार अभियानाचा आढावावर्धा : यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, कुणी करायची आणि किती दिवसांत करायची, हे नियोजित असायला हवे. यापुढे केवळ कागदावरील कामे चालणार नाही. जमत नसेल तर तेसुद्धा सांगा, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जलयुक्त शिवार अभियानातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.जिल्हाधिकारी सलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांमध्ये असलेला असमन्वय चांगलाच खटकल्याचे समजते. याप्रसंगी जलयुक्त शिवारची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना २१४ गावांत प्रशासकीय मान्यता दिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिलेत. बैठकीला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच समितीचे सदस्य माधव कोटस्थाने प्रामुख्याने उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात राज्य जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे २ हजार २७२ कामे घेण्यात येणार आहे. १ हजार ७३६ कामे पूर्ण झाली तर ५३६ कामे प्रगतिपथावर आहेत. गावनिहाय सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या जलसंधारणाच्या कामांबाबत संपूर्ण माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्यात. शिवाय संपूर्ण विभागाची माहिती संकलनामध्ये समानता असावी, अशी सूचना करण्यासही ते विसरले नाहीत.(जिल्हा प्रतिनिधी)गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचे निर्देशजलयुक्त शिवार अभियानात तालुका तसेच जिल्हास्तरावर समितीचे गठण करून या समितीमार्फत जिल्ह्यातील संपूर्ण कामांची एकत्रित माहिती सादर करावी, अशी सूचना करताना या अभियानासाठी ४५ कोटी ६८ लाखांचा निधी प्राप्त झाला असून यात विशेष अनुदान जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधूनही निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता त्रयस्त संस्थेमार्फत तपास व मूल्यमापन करण्यासाठी संस्थेची नियुक्ती त्वरित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.जलयुक्त शिवार अभियानात राज्य जलसंधारण विभागात ७० कामे प्रस्तावित करण्यात आली असून केवळ २५ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे येत्या दोन दिवसात सुरू करावीत, अशा कडक शब्दात सूचनाही त्यांनी दिल्यात.जि.प. लघुसिंचन विभागातर्फे साखळी सिमेंट नालाबांधची १०७ कामे घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण व ढाळीचे बांध, अशी ३०८ कामे, वनविभागाची ८३ कामे, पाणी पुरवठा विभागाच्या ७७ कामांना विशेष निधीतून मान्यता देण्यात आली आहे. सिंचन विभागाच्या ठिबक व तुषार सिंचनाच्या ११६० कामांचाही कार्यक्रमात समावेश आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागातर्फे भूमिगत सिमेंट बंधारा, नाला ट्रेंच तसेच रिचार्ज शाफ्टची ४८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. लोकसहभागातून तसेच सीएसआर फंडातून जिल्ह्यात अधिकाधिक कामे पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.