शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

सामाजिक न्याय प्रस्थापनेशिवाय आरक्षण समाप्ती नाही

By admin | Updated: November 26, 2015 02:09 IST

संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले

देवीदास घोडेस्वार : संविधान जागर परिषद वर्धा : संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठीची ती व्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपविली तर भविष्यात आरक्षणाची गरजच राहणार नाही,असे मत संविधान सभा डिबेटस्चे मराठी भाषांतरकार प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय आणि वर्धेतील पुरोगामी संघटनांच्या महासंघातर्फे संविधान दिनानिमित्त बुधवारी भारतीय संविधान आणि आरक्षण विषयावर आयोजित संविधान जागर परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बापुरावजी देशमुख फाऊंडेशनचे सचिव डॉ. भा. की. खडसे होते. संविधान सन्मान चळवळतील अग्रणी व माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे हे उद्घाटक होते. ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन चौधरी, प्राचार्य रंभा सोनाये व केंद्र समन्वयक डॉ. सुधाकर सोनोने आदींची मंचावर उपस्थिती होती. घोडेस्वार म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको अशी स्वत: आंबेडकरांचीच भूमिका होती. राजकीय आरक्षणाची मर्यादा ही केवळ १० वर्षासाठी होती. त्याचाच बाऊ करीत आरक्षण विरोधक सरसकट सामाजिक, शैक्षणिक आरक्षणही १० वर्षासाठीच होते, असा संभ्रम पसरवितात ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधान जागराची लोकचळवळ व्हायला हवी असे मत व्यक्त केले. नितीन चौधरी यांनीही आरक्षणाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ, खडसे म्हणाले, मूल्यांची ताकद चिरंतन असते. त्यामुळे संविधानातून मूल्यांच्या आधारे देशाची उभारणी झाली तर ती शाश्वत होईल. सहसमन्वयक डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. मालिनी वडतकर, डॉ. प्रतिभा ताकसांडे, यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. संचालन प्रा. सोनाली सिरभाते, तर प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी आभार मानले. प्रा. दीपक महाजन, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. विश्वकर्मा, डॉ. रेखा बोबडे, दिनेश भगत, विजय चौधरी, विनोद बावणे, प्रमोद माथनकर, मुंजेवार, आगलावे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)