शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सामाजिक न्याय प्रस्थापनेशिवाय आरक्षण समाप्ती नाही

By admin | Updated: November 26, 2015 02:09 IST

संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले

देवीदास घोडेस्वार : संविधान जागर परिषद वर्धा : संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठीची ती व्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपविली तर भविष्यात आरक्षणाची गरजच राहणार नाही,असे मत संविधान सभा डिबेटस्चे मराठी भाषांतरकार प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय आणि वर्धेतील पुरोगामी संघटनांच्या महासंघातर्फे संविधान दिनानिमित्त बुधवारी भारतीय संविधान आणि आरक्षण विषयावर आयोजित संविधान जागर परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बापुरावजी देशमुख फाऊंडेशनचे सचिव डॉ. भा. की. खडसे होते. संविधान सन्मान चळवळतील अग्रणी व माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे हे उद्घाटक होते. ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन चौधरी, प्राचार्य रंभा सोनाये व केंद्र समन्वयक डॉ. सुधाकर सोनोने आदींची मंचावर उपस्थिती होती. घोडेस्वार म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको अशी स्वत: आंबेडकरांचीच भूमिका होती. राजकीय आरक्षणाची मर्यादा ही केवळ १० वर्षासाठी होती. त्याचाच बाऊ करीत आरक्षण विरोधक सरसकट सामाजिक, शैक्षणिक आरक्षणही १० वर्षासाठीच होते, असा संभ्रम पसरवितात ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधान जागराची लोकचळवळ व्हायला हवी असे मत व्यक्त केले. नितीन चौधरी यांनीही आरक्षणाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ, खडसे म्हणाले, मूल्यांची ताकद चिरंतन असते. त्यामुळे संविधानातून मूल्यांच्या आधारे देशाची उभारणी झाली तर ती शाश्वत होईल. सहसमन्वयक डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. मालिनी वडतकर, डॉ. प्रतिभा ताकसांडे, यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. संचालन प्रा. सोनाली सिरभाते, तर प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी आभार मानले. प्रा. दीपक महाजन, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. विश्वकर्मा, डॉ. रेखा बोबडे, दिनेश भगत, विजय चौधरी, विनोद बावणे, प्रमोद माथनकर, मुंजेवार, आगलावे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)