शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

रसूलपुरात वीज जोडणी केलीच नाही

By admin | Updated: September 14, 2016 00:49 IST

पेठ अमहदपूर ग्रामपंचायत अंतर्गत रसुलपूर वसाहतीत गत २० ते २५ वर्षांपासून रस्ते, नाल्या

केबलद्वारे तात्पुरती व्यवस्था : नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबविण्याची मागणीआष्टी (शहीद) : पेठ अमहदपूर ग्रामपंचायत अंतर्गत रसुलपूर वसाहतीत गत २० ते २५ वर्षांपासून रस्ते, नाल्या, विजेचा प्रश्न प्रलंबित आहे. सार्वजनिक विजेचे दिवे लावण्यासाठी उभ्या विद्युत खांबावर ताराची जोडणी अद्यापही करण्यात आली नाही. यामुळे केबल टाकून तात्पूरती विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविल्याची तक्रार नागरिकांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेठ अहमदपूर ग्रा.प. ची रसुलपूर वसाहत एक वॉर्ड आहे. येथे सर्व नोकरी करणारे कर्मचारी, शिक्षक तथा व्यावसायिक राहतात. मोठ्या प्रमाणात नळपट्टी व घर कर वसुली करून ग्रामपंचायतचा कारभार चालतो; पण नागरिकांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. ९० टक्के रस्ते निर्माणाच्या प्रतीक्षेत आहेत. नाल्यांचेही बांधकाम झालेले नाही. पथदिवेही अद्यापर्यंत तारांची जोडणी करून सुरू करण्यात आलेले नाही. नागरिकांनी वारंवार वीज तारा जोडून विद्युत पथदिवे कायम करण्याची मागणी केली; पण महावितरणकडून तात्पूरती व्यवस्था म्हणून केबलद्वारे रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावण्यात आले आहेत. यानंतर आजपर्यंत या खांबावर विद्युत तारांची जोडणी करण्यात आलेली नाही. सदर केबल वादळ व उन्हामुळे खराब होऊन लोंबकळत आहेत. जमिनीपर्यंत लोंबकळत असलेले हे केबल अपघातास निमंत्रण देत असल्याचेच दिसते. केबलद्वारेच सिंगल फेज विजेची जोडणी करून देण्यात आली. यामुळे व्होल्टेजची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. परिणामी, नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, विहिरीवरील पाण्याच्या मोटारी यासह विजेवर चालणारी उपकरणे वारंवार जळत आहेत. याबाबत सहायक अभियंता कार्यालयाला रसुलपूर वसाहतीमधील नागरिकांनी निवेदन दिले. त्वरित थ्री फेज विद्युत जोडणी व खांबावर तार टाकून पथदिवे कायमस्वरूपी लावण्याची मागणी केली आहे. निवेदनावर दिनेश इंगळे, राजेंद्र कुरवाडे, गजानन बाळापूरे, राजीव ढोले, मोहन निंभोरकर, गुणवंत मानमोडे, समीर कोहळे, राजू चौरेवार, ओमप्रकाश होले, संजय तराळे, सुनील उगोकार, दिलीप पखाले, सुरेश कोल्हे आदींच्या सह्या आहेत. सर्व नागरिकांनी आतापर्यंत अनेकदा निवेदने दिली; पण कुठलिही कार्यवाही करण्यात आली नाही.(तालुका प्रतिनिधी)