शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेवटच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:49 IST

Wardha : सीसीआयची खरेदी बंद असल्याने बाजार समितीचे सभापती एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या घरात अद्याप निम्मा कापूस शिल्लक असताना दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद आहे. परिणामी कापूस उत्पादकांना आधारभूत किमतीपासून वंचित राहावे लागत आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाने कापसाच्या शेवटच्या बोंडापर्यंत सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. 

सीसीआयने फेब्रुवारी महिन्यांत एक दिवस कापूस खरेदी करून लागलीच दुसऱ्या दिवसांपासून तांत्रिक अडचणीच्या नावाखाली सीसीआयने खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यात सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत आहे.

परंतु, राष्ट्रीय पातळीवरील हे सॉफ्टवेअर असून, त्यामध्ये इतके दिवस अडचण येणे अशक्य आहे. यावरून शासनाला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा नाही, असेच दिसून येत असल्याचेही सभापती गावंडे म्हणाले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, सिंदी बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार, वर्धाचे उपसभापती पांडुरंग देशमुख व हिंगणघाटचे उपसभापती हरीश वडतकर यांची उपस्थिती होती.

तुरीसह चण्याचीही आधारभूत किमतीत खरेदी करावीशेतकऱ्यांच्या तुरी निघायला सुरुवात झाली असून, एक महिन्यापासून तुरी बाजारपेठेत विक्रीस येत आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने ७ हजार ५५० रुपये हमीभावाप्रमाणे शासकीय खरेदी सुरू करावी. हेच धोरण चण्याकरिताही वापरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सभापती गावंडे यांनी यावेळी केली.

सोयाबीनच्या नोंदणीला महिनाभर मुदतवाढ द्याशेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन घरीच ठेवले असून, आता शासनाने सोयाबीनची नोंदणी व खरेदीही बंद केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अद्याप सोयाबीन असून, महिनाभराकरिता नोंदणी सुरू करून त्यांचे सोयाबीन आधारभूत किमतीत खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बारमाही शासकीय खरेदी सुरू राहावी : सुधीर कोठारीजिल्ह्यात आतापर्यंत २० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी १३ लाख ८३ हजार क्विंटल कापूस खासगी, तर ६ लाख ७८ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात असून, शासनाने तातडीने सीसीआयची खरेदी सुरू करावी. आधीच शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते हताश झालेले आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत भाव मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. अनेकदा याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यामुळे बारमाही शासकीय खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी