शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शासनाने शेवटच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:49 IST

Wardha : सीसीआयची खरेदी बंद असल्याने बाजार समितीचे सभापती एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या घरात अद्याप निम्मा कापूस शिल्लक असताना दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद आहे. परिणामी कापूस उत्पादकांना आधारभूत किमतीपासून वंचित राहावे लागत आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाने कापसाच्या शेवटच्या बोंडापर्यंत सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. 

सीसीआयने फेब्रुवारी महिन्यांत एक दिवस कापूस खरेदी करून लागलीच दुसऱ्या दिवसांपासून तांत्रिक अडचणीच्या नावाखाली सीसीआयने खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यात सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत आहे.

परंतु, राष्ट्रीय पातळीवरील हे सॉफ्टवेअर असून, त्यामध्ये इतके दिवस अडचण येणे अशक्य आहे. यावरून शासनाला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा नाही, असेच दिसून येत असल्याचेही सभापती गावंडे म्हणाले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, सिंदी बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार, वर्धाचे उपसभापती पांडुरंग देशमुख व हिंगणघाटचे उपसभापती हरीश वडतकर यांची उपस्थिती होती.

तुरीसह चण्याचीही आधारभूत किमतीत खरेदी करावीशेतकऱ्यांच्या तुरी निघायला सुरुवात झाली असून, एक महिन्यापासून तुरी बाजारपेठेत विक्रीस येत आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने ७ हजार ५५० रुपये हमीभावाप्रमाणे शासकीय खरेदी सुरू करावी. हेच धोरण चण्याकरिताही वापरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सभापती गावंडे यांनी यावेळी केली.

सोयाबीनच्या नोंदणीला महिनाभर मुदतवाढ द्याशेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन घरीच ठेवले असून, आता शासनाने सोयाबीनची नोंदणी व खरेदीही बंद केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अद्याप सोयाबीन असून, महिनाभराकरिता नोंदणी सुरू करून त्यांचे सोयाबीन आधारभूत किमतीत खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बारमाही शासकीय खरेदी सुरू राहावी : सुधीर कोठारीजिल्ह्यात आतापर्यंत २० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी १३ लाख ८३ हजार क्विंटल कापूस खासगी, तर ६ लाख ७८ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात असून, शासनाने तातडीने सीसीआयची खरेदी सुरू करावी. आधीच शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते हताश झालेले आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत भाव मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. अनेकदा याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यामुळे बारमाही शासकीय खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी