शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

शासनाने शेवटच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:49 IST

Wardha : सीसीआयची खरेदी बंद असल्याने बाजार समितीचे सभापती एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या घरात अद्याप निम्मा कापूस शिल्लक असताना दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद आहे. परिणामी कापूस उत्पादकांना आधारभूत किमतीपासून वंचित राहावे लागत आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाने कापसाच्या शेवटच्या बोंडापर्यंत सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. 

सीसीआयने फेब्रुवारी महिन्यांत एक दिवस कापूस खरेदी करून लागलीच दुसऱ्या दिवसांपासून तांत्रिक अडचणीच्या नावाखाली सीसीआयने खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यात सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत आहे.

परंतु, राष्ट्रीय पातळीवरील हे सॉफ्टवेअर असून, त्यामध्ये इतके दिवस अडचण येणे अशक्य आहे. यावरून शासनाला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा नाही, असेच दिसून येत असल्याचेही सभापती गावंडे म्हणाले. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, सिंदी बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार, वर्धाचे उपसभापती पांडुरंग देशमुख व हिंगणघाटचे उपसभापती हरीश वडतकर यांची उपस्थिती होती.

तुरीसह चण्याचीही आधारभूत किमतीत खरेदी करावीशेतकऱ्यांच्या तुरी निघायला सुरुवात झाली असून, एक महिन्यापासून तुरी बाजारपेठेत विक्रीस येत आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने ७ हजार ५५० रुपये हमीभावाप्रमाणे शासकीय खरेदी सुरू करावी. हेच धोरण चण्याकरिताही वापरून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सभापती गावंडे यांनी यावेळी केली.

सोयाबीनच्या नोंदणीला महिनाभर मुदतवाढ द्याशेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन घरीच ठेवले असून, आता शासनाने सोयाबीनची नोंदणी व खरेदीही बंद केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अद्याप सोयाबीन असून, महिनाभराकरिता नोंदणी सुरू करून त्यांचे सोयाबीन आधारभूत किमतीत खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बारमाही शासकीय खरेदी सुरू राहावी : सुधीर कोठारीजिल्ह्यात आतापर्यंत २० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी १३ लाख ८३ हजार क्विंटल कापूस खासगी, तर ६ लाख ७८ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात असून, शासनाने तातडीने सीसीआयची खरेदी सुरू करावी. आधीच शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते हताश झालेले आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत भाव मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. अनेकदा याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यामुळे बारमाही शासकीय खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी