शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या शासकीय खरेदीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:34 IST

सोयाबीन उत्पादकांना हमीभावाच्या हमीकरिता शासनाच्यावतीने खरेदी केंद्र सुरू केले.

ठळक मुद्देनऊ केंद्रांवरून २ हजार २६३ क्विंटलची खरेदी : १४४ शेतकºयांकडून आतापर्यंत खरेदी

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन उत्पादकांना हमीभावाच्या हमीकरिता शासनाच्यावतीने खरेदी केंद्र सुरू केले. बाजारात सोयाबीनची आवक वाढली असताना या खरेदीकडे शेतकºयांनी मात्र पाठ केली आहे. विविध बाजार समितीच्या आवारात एकूण नऊ शासकीय खरेदी आहे. या केंद्रावर शेतकºयांची गर्दी नाही. या केंद्रावरून आतापर्यंत १४४ शेतकºयांकडून केवळ २ हजार २८३ क्ंिवटल सोयाबनची खरेदी झाली आहे. केंद्रांवरील नियमांच्या गर्दीमुळे शेतकरी व्यापाºयांना कमी दरात सोयाबीन देत असल्याचे चित्र बाजारात आहे.हंगामात शेतकºयांचा शेतमाल बाजारात येताच चढलेले दर पडतात. यामुळे शेतकºयांना मोठा फटका सहन करावा लागतो. यात त्यांना हमीभावही मिळत नाही. असे म्हणत शासनाच्यावतीने यंदा शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करून शासकीय केंद्रावर सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला मात्र शासनाच्या कामाप्रमाणे खरेदी विलंबाने सुरू झाली. यातही शेतकºयांच्या आॅनलाईन नोंदीची अटक असल्याने ही पद्धत शेतकºयांकरिता अडचणीची ठरत असल्याचे समोर आले. शिवाय केंद्र सुरू करण्याची आणि शेतकºयांची नोंद करण्याची जबाबदारी दिलेल्या सेवा सहकारी संस्था तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसल्याचे दिसून आले. परिणामी, हे शासकीय केंद्र शेतकºयांकरिता कुचकामी ठरल्याचे दिसून आले. खरेदी सुरू झाल्यानंतर आॅनलाईन नोंदी करणाºया शेतकºयांना सोयाबीन आणताना पाळावयाच्या अटींची एक यादीच देण्यात आली. या यादीतील नियमांत बरेच शेतकरी बसत नसल्याने त्यांनी त्यांचे सोयाबीन व्यापाºयांना विकण्याचा निर्णय घेतल्याने शासकीय केंद्र ओस पडले.नियमात अडले ६९.६३ लाखांचे चुकारेशासनाच्या खरेदी केंद्रातील नियमानुसार एकूण १४४ शेतकºयांच्या सोयाबीनची खरेदी झाली. हमीभावानुसार त्यांना चुकारे मिळणार यात दुमत नाही. नियमानुसार शेतमाल दिल्यानंतर किमान आठ दिवसात चुकारे आॅनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. येथे मात्र शेतकºयांना एक रुपयाही मिळाला नाही. या शेतकºयांकडून खरेदी केलेला शेतमाल अद्याप शासनाच्या गोदामात पोहोचायचा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा शेतमाल शासनाच्या गोदामात गेल्यानंतर या शेतकºयांना चुकारे मिळणार असल्याने तब्बल १४४ शेतकºयांचे ६९,६३,७२९ रुपयांचे चुकारे अडले आहेत.शासनाच्या नियमात भरतेय व्यापाºयांची झोळीशासनाकडून सोयाबीनची खरेदी आॅनलाईन करण्यात आली. यात असलेल्या अटी व नियमांमुळे शेतकºयांची गोची झाली आहे. सोयाबीनच्या दर्जाच्या कारणावरून अनेक शेतकºयांचे सोयाबीन परत केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुुळे शेतकºयांकडून जरा नियम शिथील करा, अशी मागणी होत आहे. या नियमांमुळे शेतकºयांनी व्यापाºयांनाच सोयाबीन देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. शासकीय केंद्रावर होत असलेल्या नियमांच्या अतिरेकामुळे जिल्ह्यात खासगी व्यापाºयांची झोळी भरली जात आहे. यात व्यापारी सोयाबीनला २ हजाराच्या आसपास दर देत असून लूट कायम आहे.आतापर्यंत १,४५० शेतकºयांचीच नोंदणीवर्धा जिल्ह्यात एकूण सात बाजार समिती आहे. शिवाय या बाजारात येण्याकरिता शेतकºयांना त्रास होणार नाही याची दखल घेत या बाजार समित्यांनी त्यांचे उपबाजार सुरू केले आहे. असे एकूण सात उपबाजार कार्यरत आहेत. या बाजार समिती आणि त्यांच्या उपबाजारात शासनाच्यावतीने एकूण नऊ केंद्र सुरू केले आहे. यापैकी वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट, आर्वी आणि सिंदी (रेल्वे) या सहा केंद्रावरच खरेदी सुरू झाली आहे. तर समुद्रपूर, कारंजा आणि सेलू या तीन केंद्रांवर अद्याप खरेदी सुरू झाली नसून केवळ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू आहे. या नऊही केंद्रांवरून आतापर्यंत १ हजार ४५० शेतकºयांची नोंदणी झाली आहे.

शासकीय खरेदी केंद्रांवर होणारी खरेदी शासकीय नियमाला अधीन राहूनच होईल. यामुळे शेतकºयांची निराशा होत आहे. याला पर्याय नाही. नियमात बसलेला शेतमाल येथे खरेदी करण्यात आला आहे. त्याचे चुकारे शेतकºयांच्या खात्यात आॅनालईन जमा होणार आहेत.- अजय बिसने, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.