शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

निविदा मंजूर; पण कामांचा पत्ताच नाही

By admin | Updated: December 9, 2015 02:31 IST

शहराची तहाण भागविणाऱ्या कार नदी प्रकल्पात गेलेल्या गावांचे पुनर्वसन खैरी येथे करण्यात आले.

खैरी पुनर्वसन : मूलभूत सुविधांचा अभावरूपेश मस्के कारंजा (घा.)शहराची तहाण भागविणाऱ्या कार नदी प्रकल्पात गेलेल्या गावांचे पुनर्वसन खैरी येथे करण्यात आले. या खैरी पुनर्वसन वसाहतीतील रस्ते, नाली, ग्रामपंचायत भवन व पाण्याची टाकी बांधकामाच्या निवीदा तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाले; पण अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे कामे मंजूर झाली; पण आता कामे सुरू होत नसल्याने असंतोष पसरला आहे.खैरी पुनर्वसन वसाहतीमधील रस्ते, नाली, ग्रा.पं. भवन व पाण्याच्या टाकी बांधकामासाठी तीन महिन्यांपूर्वी निवीदा काढण्यात आल्या. सदर निवीदा मंजूर झाल्या आहेत; पण अद्याप कामाला सुरूवात झाली नाही. कामाची संपूर्ण माहिती इस्टिमेटसह देऊनच काम सुरू करावे, अशी मागणी कारनदी प्रकल्पग्रस्त समितीने केली आहे. याबाबत कार नदी प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. कार प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा लोकमतने पाठपुरावा केला. गत १५ वर्षांपासून खैरी पुनर्वसन येथील नागरिक १८ नागरी सुविधांपासून वंचित आहेत. येथील रस्ते, नाल्या, पाण्याची टाकी आदी समस्या अद्याप जैसे थे आहे. यासाठी प्रकरल्पग्रस्त समितीने काही दिवसांपूर्वी कारनदी प्रकल्प कार्यालयास कुलूपही ठोकले होते. हे आंदोलन सतत तीन दिवस करण्यात आले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या पाठपुराव्यामुळे येथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासन जागे झाले. रस्ते, नाली, ग्रा.पं. भवन व पाण्याची टाकी या कामांच्या निवीदा काढण्यात आल्या; पण तीन महिन्यांपासून टेंडरिंग होऊनही बांधकामास मुहूर्त गसवला नाही. यामुळे कधी सुरु होणार, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित करीत आहेत.कारंजा तालुक्याचा काही भाग सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी व शहराची आजीवन तहाण भागावी म्हणून हा प्रकल्प निर्माण करण्यात आला. प्रकल्पामुळे परिसरातील कोरडवाहु जमीन ओलिताखाली आली. यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांचीच अवस्था दयनीय झाली आहे. त्यांना अद्यापही १८ नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचेच दिसून येत आहे.