शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

माथा ते पायथा संकल्पनेनुसार जलयुक्त शिवारची कामे घ्या

By admin | Updated: October 8, 2015 01:50 IST

जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा.

आशुतोष सलील : कमी खर्चात अधिक जलसाठा, गावस्तरावरील आराखड्यांची पाहणीवर्धा : जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा. प्रत्येक नाला हा माथा ते पायथा या संकल्पनेनुसार अडवून गावाचे शिवार जलयुक्त करण्यास प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात गावांच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, अपर मुख्य कार्र्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवारामध्ये कमी खर्चात अधिकाधिक जलसाठे निर्माण होतील या दृष्टीने सिमेंट नालाबांध वा गाव तलावाच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन कामे घेताना माथा ते पायथा या संकल्पनेनुसार पाण्याची उपलब्धता बाराही महिने होईल, असे नवीन व दुरूस्तीची कामे घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार कार्यक्रम राबविताना गाव आराखडा हा परिपूर्ण असावा या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. जिल्हाधिकारी समिती प्रत्येक तालुका स्तरावर याबाबत आढावा घेऊनच पुढील कार्यक्रम निश्चित करेल, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्या. जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या प्रत्येक कामांवर जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने चाऱ्याच्या जाती पशुसंवर्धन विभागातर्फे लावण्यात येणार आहे. पावसाळा संपत असताना नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी नियोजन व कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. जयलयुक्त शिवार कार्यक्रमात गाव स्तरावर जलसाठे निर्माण करताना त्याच्या योग्य वापरासाठी ग्रामस्तरावर पाणी वापर संस्था निर्माण करण्यात येऊन अशा संस्थांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने, प्रमोद पवार, नाबार्डच्या स्रेहलता बनसोड, आर.जी. वाहने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी र्ईलमे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, कार्यकारी अभियंता ढवळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीण बडगे, वन अधिकारी आदींसह सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या. प्रारंभी भारती यांनी अभियातील कामांची व नियोजनाबाबत माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)