शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी समता परिषदेचे धरणे

By admin | Updated: April 6, 2017 00:09 IST

कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने

शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध : नायब तहसीलदारांना निवेदन समुद्रपूर : कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नायब तहसीलदार लता गुजर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. महाराष्ट्रात शेतीसाठी पुरेशी वीज नाही. सिंचनाच्या सोयी नाहीत. दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली जात नाही. शेतात पिकले तर उद्योगपतींना धार्जिण्या धोरणामुळे उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नाही. भाजप सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारांवर गेला; पण कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नसल्याची सबब समोर केली जात आहे. याचा समता परिषदेने निषेध केला. म. फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व शासनाच्या धोरणामुळे त्यांना आत्महत्येकडे नेणारी अवस्था विषद केली. सरकार आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे नमूद केले. यानुसारच समता परिषदेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व विधानसभेत शेतकऱ्यांसाठी निलंबित व्हावे लागलेल्या आमदारांना पाठींबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करीत एकदिवसीय धरणे आंदोलनाने झाली.