शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी समता परिषदेचे धरणे

By admin | Updated: April 6, 2017 00:09 IST

कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने

शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध : नायब तहसीलदारांना निवेदन समुद्रपूर : कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नायब तहसीलदार लता गुजर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. महाराष्ट्रात शेतीसाठी पुरेशी वीज नाही. सिंचनाच्या सोयी नाहीत. दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली जात नाही. शेतात पिकले तर उद्योगपतींना धार्जिण्या धोरणामुळे उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नाही. भाजप सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारांवर गेला; पण कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नसल्याची सबब समोर केली जात आहे. याचा समता परिषदेने निषेध केला. म. फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व शासनाच्या धोरणामुळे त्यांना आत्महत्येकडे नेणारी अवस्था विषद केली. सरकार आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे नमूद केले. यानुसारच समता परिषदेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व विधानसभेत शेतकऱ्यांसाठी निलंबित व्हावे लागलेल्या आमदारांना पाठींबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करीत एकदिवसीय धरणे आंदोलनाने झाली.