शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Updated: March 11, 2017 00:32 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ

आर्वीत सर्वपक्षीय मोर्चा : रस्त्यावर तहसीलदारांना निवेदन आर्वी : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. यामुळे शुक्रवारी आर्वीत या मुद्यावर भाजप वगळता ईव्हीएमचा विरोध करीत सर्व पक्षांनी एकत्र येत या मशीनची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढली. मोर्चाद्वारे यावेळी बॅलेट पेपरवर निवडणूक पद्धती अंमलात आणण्याची मागणी लावून धरली. आर्वीत आयोजित या सर्वपक्षीय मोर्चाचा प्रारंभ दुपारी १ वाजता झाला. हा मोर्चा सिव्हील लाईन गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदार विजय पवार यांना इव्हीएम मशीनची पद्धत बंद करून बॅलेट पेपर निवडणूक घेण्याच्या मागणीचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. या निवेदनात आर्वीत झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चात इव्हीएम हटवा लोकशाही वाचवा, हुकूमशाही बंद करा आदी नाऱ्याचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती देण्यात आले होते. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करुन येणारी निवडणूक बॅलेटच्या पद्धतीने करण्याची मागणी मोर्चात सहभागी पक्षांच्या प्रमुखांनी केली. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार अमर काळे यांनी केले. मोर्चानंतर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. लोकशाहीत मतदान चोरीचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप आ. अमर काळे यांनी केला. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून भाजपाने ही निवडणूक जिंकल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने संदीप काळे, शिवसेनेच्यावतीने निलेश देशमुख, बसपाचे सुनील डोंगरे, पिरीपाचे मेघराज डोंगरे, युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे आदींनी विचार व्यक्त केले. प्रत्येकाने ईव्हीएमच्या घोळाची चौकशीची करण्याची मागणी केली. सभेचे संचालन करीत प्रा. पंकज वाघमारे यांनी आभार व्यक्त कले. या मोर्चात काँग्रेस, बसपा, राकाँ, पीरिपा, युवा स्वाभिमान, शिवसेना, प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीे. यावेळी तालुक्यातील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.(तालुका/शहर प्रतिनिधी) त्या घटनेचा निषेध आर्वीत दोन दिवसांपासून भाजपा आणि प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांत वाद उफाळला आहे. प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप हे घटनेच्यावेळी हजर नसतानाही केवळ राजकीय आकसापोटी व पोलीस विभागावर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचाही यावेळी आ. काळे यांनी निषेध नोंदविला.