शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Updated: March 11, 2017 00:34 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ

आर्वीत सर्वपक्षीय मोर्चा : रस्त्यावर तहसीलदारांना निवेदन आर्वी : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. यामुळे शुक्रवारी आर्वीत या मुद्यावर भाजप वगळता ईव्हीएमचा विरोध करीत सर्व पक्षांनी एकत्र येत या मशीनची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढली. मोर्चाद्वारे यावेळी बॅलेट पेपरवर निवडणूक पद्धती अंमलात आणण्याची मागणी लावून धरली. आर्वीत आयोजित या सर्वपक्षीय मोर्चाचा प्रारंभ दुपारी १ वाजता झाला. हा मोर्चा सिव्हील लाईन गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदार विजय पवार यांना इव्हीएम मशीनची पद्धत बंद करून बॅलेट पेपर निवडणूक घेण्याच्या मागणीचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. या निवेदनात आर्वीत झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चात इव्हीएम हटवा लोकशाही वाचवा, हुकूमशाही बंद करा आदी नाऱ्याचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती देण्यात आले होते. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करुन येणारी निवडणूक बॅलेटच्या पद्धतीने करण्याची मागणी मोर्चात सहभागी पक्षांच्या प्रमुखांनी केली. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार अमर काळे यांनी केले. मोर्चानंतर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. लोकशाहीत मतदान चोरीचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप आ. अमर काळे यांनी केला. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून भाजपाने ही निवडणूक जिंकल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने संदीप काळे, शिवसेनेच्यावतीने निलेश देशमुख, बसपाचे सुनील डोंगरे, पिरीपाचे मेघराज डोंगरे, युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे आदींनी विचार व्यक्त केले. प्रत्येकाने ईव्हीएमच्या घोळाची चौकशीची करण्याची मागणी केली. सभेचे संचालन करीत प्रा. पंकज वाघमारे यांनी आभार व्यक्त कले. या मोर्चात काँग्रेस, बसपा, राकाँ, पीरिपा, युवा स्वाभिमान, शिवसेना, प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीे. यावेळी तालुक्यातील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.(तालुका/शहर प्रतिनिधी) त्या घटनेचा निषेध आर्वीत दोन दिवसांपासून भाजपा आणि प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांत वाद उफाळला आहे. प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप हे घटनेच्यावेळी हजर नसतानाही केवळ राजकीय आकसापोटी व पोलीस विभागावर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचाही यावेळी आ. काळे यांनी निषेध नोंदविला.