शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

चिखलाच्या रस्त्यामुळे विद्यार्थी त्रस्त

By admin | Updated: July 17, 2016 00:33 IST

स्थानिक सरस्वती विद्यामंदिर या शाळेपर्यंत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. रस्त्यावर चिखलाचे ...

पालकांत असंतोष : प्रशासनाचे दुर्लक्ष आंजी (मोठी) : स्थानिक सरस्वती विद्यामंदिर या शाळेपर्यंत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागतो. याकडे शाळा व ग्रा.पं. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. रस्त्यावर साचलेला चिखल पाहून पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. वर्धा ते आर्वी मार्गावरील पुनर्वसनमध्ये सरस्वती विद्यामंदिर आहे. आंजीत गत काही वर्षांपासून ती कार्यरत आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने स्थानिकांसह लगतच्या गावांतील पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून या शाळेत दाखल केले; पण अपेक्षित सुविधा पुरविल्या जात नसल्याची ओरड होत आहे. आर्वी ते वर्धा मार्गावरील काही अंतरावर शाळेची इमारत आहे. इमारत परिसरात झाडे-झुडपे वाढली आहे. शाळेत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. खडीकरणाचा रस्ता आहे. या मार्गावर पाण्याचे डबके साचले आहे. विद्यार्थ्यांना डबक्यातून मार्ग शोधावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काही पालकांनी मुख्याध्यापिकेला निवेदन दिलेल पण त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने त्या रस्त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे होते; पण त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पालकांत असंतोष पसरला आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)