शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थीही बसले उपोषणाला

By admin | Updated: May 14, 2016 02:02 IST

गत चार दिवसांपासून आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहे.

आंदोलनाचा चौथा दिवस: मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षआर्वी : गत चार दिवसांपासून आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहे. चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची अद्याप संबंधित यंत्रणेने दखल न घेतल्याने याबाबत गावकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.चार दिवसांपासून गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. देऊरवाडा मार्गे निंबोली (शेंडे) गावात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने गावात परिवहनची बस येत नाही. या गावातील विद्यार्थ्यांना चार ते सहा किमी पायपीट करीत देऊरवाडा येथे शाळेत जावे लागते. सध्या हे सर्व विद्यार्थी खाजगी वाहनाने गत दोन महिन्यापासून आर्थिक भुर्दंड सहन करीत शाळा गाठत आहेत. ज्यादिवशी गावात खाजगी वाहन येत नाही किंवा रस्त्यात वाहनामध्ये बिघाड झाल्यास शाळेत, विद्यार्थी उशिरा पोहचतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे. गावात बस येण्यासाठी रस्त्याची कायम दुरूस्ती करावी व नियमित बससेवा देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला असून विद्यार्थीही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात येते.(तालुका प्रतिनिधी)