शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

संगणकाचे विद्यार्थी एसटी पासपासून वंचित

By admin | Updated: April 10, 2015 01:41 IST

तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ ...

कारंजा (घा.) : तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ कर्मचाऱ्यांवर तर एमएससीआयटी प्रशिक्षण घेण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते़ हे प्रशिक्षण न घेतलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखली जाते; पण संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना बसची पास मिळत नाही़ यामुळे गरीब, गरजू विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते़ शासन एकीकडे संगणकीय शिक्षणाला काळानुरूप महत्त्व देत आहे़ असे असताना राज्य परिवहन महामंडळ हे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचे नाकारत आहे़ याद्वारे विद्यार्थ्यांवर अन्यायच होत असल्याचे दिसते़ शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करण्याचे कार्य सध्या परिवहन महामंडळ करताना दिसते़ शहरात दोन अधिकृत शासनमान्य व एमकेसीएल पुरस्कृत संगणकाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये दररोज २०० च्या आसपास विद्यार्थी ग्रामीण भागातून येथे येतात़ यातील बहुतांश विद्यार्थी गरीब घरातील; पण होतकरू आहेत़ काही शेतकऱ्यांची मुले आहेत. या विद्यार्थ्यांना बसची सवलत पास नाकारली जात असल्याने अधिक पैसे खर्च करून बसने प्रवास करावा लागतो़ काही विद्यार्थी पैसे वाचविण्याकरिता अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत असल्याचे दिसते़ हा प्रवास जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतो़ या अवैध प्रवासात अपघात होऊन जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिक्षणासाठी मोफत पास देण्याची परिवहन महामंडळाची योजना आहे; पण संगणक शिक्षणासाठी ती सवलत दिली जात नाही़ यामुळे एस.टी. महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून संगणकीय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पास देण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)