शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संगणकाचे विद्यार्थी एसटी पासपासून वंचित

By admin | Updated: April 10, 2015 01:41 IST

तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ ...

कारंजा (घा.) : तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ कर्मचाऱ्यांवर तर एमएससीआयटी प्रशिक्षण घेण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते़ हे प्रशिक्षण न घेतलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखली जाते; पण संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना बसची पास मिळत नाही़ यामुळे गरीब, गरजू विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते़ शासन एकीकडे संगणकीय शिक्षणाला काळानुरूप महत्त्व देत आहे़ असे असताना राज्य परिवहन महामंडळ हे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचे नाकारत आहे़ याद्वारे विद्यार्थ्यांवर अन्यायच होत असल्याचे दिसते़ शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करण्याचे कार्य सध्या परिवहन महामंडळ करताना दिसते़ शहरात दोन अधिकृत शासनमान्य व एमकेसीएल पुरस्कृत संगणकाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये दररोज २०० च्या आसपास विद्यार्थी ग्रामीण भागातून येथे येतात़ यातील बहुतांश विद्यार्थी गरीब घरातील; पण होतकरू आहेत़ काही शेतकऱ्यांची मुले आहेत. या विद्यार्थ्यांना बसची सवलत पास नाकारली जात असल्याने अधिक पैसे खर्च करून बसने प्रवास करावा लागतो़ काही विद्यार्थी पैसे वाचविण्याकरिता अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत असल्याचे दिसते़ हा प्रवास जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतो़ या अवैध प्रवासात अपघात होऊन जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिक्षणासाठी मोफत पास देण्याची परिवहन महामंडळाची योजना आहे; पण संगणक शिक्षणासाठी ती सवलत दिली जात नाही़ यामुळे एस.टी. महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून संगणकीय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पास देण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)