शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

चार वर्षांत पीककर्जाच्या उद्दिष्टाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना हंगामामध्ये वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी करुन अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी पाश : शासन, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये पीककर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता बँकांना दरवर्षी उद्दिष्टे ठरवूून दिले जाते. त्यानंतर हंगामामध्ये शतप्रतिशत शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासनासह प्रशासनाकडूनही सूचना केल्या जातात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून बँकांनी आपली उद्दिष्टपूर्ती केली नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता असहकार्य केल्याने सावकारी कर्जाचा फास आणखीच घट्ट होत आहे.अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना हंगामामध्ये वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी करुन अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो. मात्र मागील चार वर्षांपासून बँकांनी आडमुठ धोरण अवलंबिल्याने शेतकऱ्यांना पीककर्जाकरिता बँकांचे उबरठे झिजवावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक व प्रादेशिक ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना पतपुरवठा केल्या जातो. २०१७-१८ मध्ये ७३० कोटीचे उद्दिष्ट असताना केवळ ३३९.५८ कोटीचेच पीककर्ज देण्यात आले. २०१८-१९ मध्ये ८५० कोटीच्या उद्दिष्टांपैकी ४२३.८७ तर २०१९-२० मध्ये ९८० कोटीचे उद्दिष्ट असताना ४३८.३६ कोटींचे कर्जवाटप केले. यावर्षीही ९२५ कोटीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ५२ हजार ४८५ शेतकऱ्यांना ५२६.१२ कोटीचेच कर्जवाटप झाले. यावर्षी वाटपाचा टक्का वाढला असला तरीही चार वर्षांमध्ये बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टांपासून लांबच राहिल्याचे दिसून आले आहे.सतत दोन वर्षे गाठले लक्ष्यशेतकऱ्यांना पीककर्जामुळे मोठा आधार मिळतो. त्यामुळे पीककर्जावर शासन, प्रशासनाकडून भर दिल्या जातो. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्याला ६०४. ५७ कोटींचे उद्दिष्टे देण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रीयकृत, खासगी व प्रादेशिक ग्रामीण बँकांनी तब्बल ६०६.६८ कोटींचे कर्जवाटप केले. तसेच २०१६-१७ मध्येही ७०० कोटींचे उद्दिष्टे असताना ७०१.०२ कोटींचे कर्ज वाटप केले. या दोन वर्षांमध्ये बँकांना उद्दिष्टपूर्ती साधता आली पण, नंतरच्या वर्षामध्ये बँकांना ते का शक्य झाले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.निश्चित केलेल्या कर्जदरानुसार मिळेना शेतकऱ्यांना कर्जशेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज देण्यासंदर्भात तज्ज्ञ समितीच्या बैठकीत प्रति एकर पीककर्जाचे दर ठरविल्या जाते. त्या दरानुसार शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज देणे गरजेचे आहे. पण, समितीने ठरवून दिलेल्या कर्ज दरानुसार शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीचा खर्च कसा चालवावा हा प्रश्न पडतो. यातूनच कर्जबाजारीपणाही वाढतो. त्याकरिता शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दरानुसार पीककर्ज देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज