शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

चार वर्षांत पीककर्जाच्या उद्दिष्टाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना हंगामामध्ये वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी करुन अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी पाश : शासन, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये पीककर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता बँकांना दरवर्षी उद्दिष्टे ठरवूून दिले जाते. त्यानंतर हंगामामध्ये शतप्रतिशत शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासनासह प्रशासनाकडूनही सूचना केल्या जातात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून बँकांनी आपली उद्दिष्टपूर्ती केली नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता असहकार्य केल्याने सावकारी कर्जाचा फास आणखीच घट्ट होत आहे.अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना हंगामामध्ये वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्यास शेतकरी वेळेवर पेरणी करुन अपेक्षित उत्पन्न घेऊ शकतो. मात्र मागील चार वर्षांपासून बँकांनी आडमुठ धोरण अवलंबिल्याने शेतकऱ्यांना पीककर्जाकरिता बँकांचे उबरठे झिजवावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक व प्रादेशिक ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना पतपुरवठा केल्या जातो. २०१७-१८ मध्ये ७३० कोटीचे उद्दिष्ट असताना केवळ ३३९.५८ कोटीचेच पीककर्ज देण्यात आले. २०१८-१९ मध्ये ८५० कोटीच्या उद्दिष्टांपैकी ४२३.८७ तर २०१९-२० मध्ये ९८० कोटीचे उद्दिष्ट असताना ४३८.३६ कोटींचे कर्जवाटप केले. यावर्षीही ९२५ कोटीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ५२ हजार ४८५ शेतकऱ्यांना ५२६.१२ कोटीचेच कर्जवाटप झाले. यावर्षी वाटपाचा टक्का वाढला असला तरीही चार वर्षांमध्ये बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टांपासून लांबच राहिल्याचे दिसून आले आहे.सतत दोन वर्षे गाठले लक्ष्यशेतकऱ्यांना पीककर्जामुळे मोठा आधार मिळतो. त्यामुळे पीककर्जावर शासन, प्रशासनाकडून भर दिल्या जातो. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्याला ६०४. ५७ कोटींचे उद्दिष्टे देण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रीयकृत, खासगी व प्रादेशिक ग्रामीण बँकांनी तब्बल ६०६.६८ कोटींचे कर्जवाटप केले. तसेच २०१६-१७ मध्येही ७०० कोटींचे उद्दिष्टे असताना ७०१.०२ कोटींचे कर्ज वाटप केले. या दोन वर्षांमध्ये बँकांना उद्दिष्टपूर्ती साधता आली पण, नंतरच्या वर्षामध्ये बँकांना ते का शक्य झाले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.निश्चित केलेल्या कर्जदरानुसार मिळेना शेतकऱ्यांना कर्जशेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज देण्यासंदर्भात तज्ज्ञ समितीच्या बैठकीत प्रति एकर पीककर्जाचे दर ठरविल्या जाते. त्या दरानुसार शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज देणे गरजेचे आहे. पण, समितीने ठरवून दिलेल्या कर्ज दरानुसार शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीचा खर्च कसा चालवावा हा प्रश्न पडतो. यातूनच कर्जबाजारीपणाही वाढतो. त्याकरिता शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दरानुसार पीककर्ज देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज