शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

हातठेला व्यावसायिकाच्या आत्महत्येने तणाव

By admin | Updated: January 16, 2017 00:37 IST

शहरातील पत्रावळी चौकात हातठेल्यावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिक युवकाने शनिवारी रात्री आत्महत्या केली.

रुग्णालयात गर्दी : अतिक्रमण हटावच्या कारवाईवर ठपका वर्धा : शहरातील पत्रावळी चौकात हातठेल्यावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिक युवकाने शनिवारी रात्री आत्महत्या केली. पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचा धसका घेऊनच सदर युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत काहींनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेख आदील शेख जलील (२२) रा. डॉ. झाकीर हुसेन कॉलनी वर्धा, असे मृतक युवकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी तो पत्रावळी चौकातून घरी गेला; पण परत आला नाही. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन कॉलनी परिसरातील मॉडेल हायस्कूल जवळील विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केली. तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नगर पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. यातच शनिवारी पत्रावळी चौकात हातगाडी लावणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसले तरी घटनेला अतिक्रमण हटाव कारवाईशी जोडले जात आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेचा धसका घेतल्यानेच युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला. शेख आदील कुटुंबातील एकुलता कमवता मुलगा होता. पत्रावळी चौकात हातगाडी लावून तो विविध साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय करीत होता. दोन दिवसांपूर्वी न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व पथकाने बाजार ओळीमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ती आदीलच्या दुकानापर्यंत पोहोचली नव्हती; पण न.प. मुख्याधिकारी व पथकाने दोन दिवसांत दुकान हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय वाहतूक पोलिसांनी दंडही केला होता. यामुळे तो हताश होता. शनिवार व रविवारी मकरसंक्रांती असल्याने त्याने विक्रीसाठी माल खरेदी केला होता. दुकान हटविले तर त्या मालाचे पैसे निघणार नाही आणि नुकसान सोसावे लागेल, अशी भीती त्याला होती. यातून नैराश्य आल्यानेच आदीलने शनिवारी रात्री आत्महत्या केल्याचा आरोप पत्रावळी चौकातील अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी केला. यातूनच त्याला अतिक्रमण हटाव मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अतिक्रमणाच्या कारवाईमुळेच आदीलने आत्महत्या केल्याचा आरोप करीत अतिक्रमण धारक व नेत्यांनी रविवारी सामान्य रुग्णालयात गर्दी केली. याप्रसंगी न.प. मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी) मृत्यूचेही राजकारण करण्याचा प्रयत्न शहरातील पत्रावळी चौकात हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाने शनिवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मृत्यूचेही राजकारण करण्याचा प्रयत्न शहरातील काहींनी केल्याचे दिसून आले. रुग्णालयात गर्दी करीत अतिक्रमणामुळेच आदीलने आत्महत्या केल्याचे ठासून सांगितले जात होते. यातून अतिक्रमण हटाव मोहिमेला पर्यायाने विकासाला विरोध करण्याचे कामच केले जात असल्याचे दिसून आले.