शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सालोडात खोड जाळून रस्ता रोको

By admin | Updated: June 5, 2017 01:00 IST

आश्वासनावर शेतकऱ्यांचा संप सुटल्याची सर्वत्र चर्चा असताना वर्धेत ठोस निर्णयाशिवाय माघार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी त्यांचा संप अधिक तीव्र केल्याचे दिसून आले आहे.

शेतकरी संप सुरूच : बाजार समितीच्या फाटकाजवळ ओतले दूध लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आश्वासनावर शेतकऱ्यांचा संप सुटल्याची सर्वत्र चर्चा असताना वर्धेत ठोस निर्णयाशिवाय माघार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी त्यांचा संप अधिक तीव्र केल्याचे दिसून आले आहे. रविवारी सकाळी संभाजी ब्रिगेडच्या मदतीने शेतकऱ्यांनी सालोड (हिरापूर) येथील टी पॉर्इंटवर खोड जाळून वाहने अडविली. शिवाय रस्त्यावर भाजी फेकली. तर वर्धेतील दूध उत्पादकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर येत घोषणाबाजी करीत उड्डाण पुलावर दूध ओतले. शेतकऱ्यांचा संप सुटला अशी चर्चा सुरू असतानाच तो अधिक भडकत असल्याचे दिसून आले आहे. येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सालोड येथील टी पॉर्इंटवर बळीराजाच्या मदतीकरिता खोड जाळत रस्ता रोको केला. यामुळे यवतमाळ, अमरावती मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या रस्ता रोको दरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकत शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपाने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधाते, तुषार उमले, अतुल शेंद्रे, वैभव तळवेकर, रूपेश वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ११ वाजताच्या सुमारास वर्धेतील दूध उत्पादकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येत आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर दूध फेकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर सकाळी १० वाजतापासून शहरानजीकच्या गावखेड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येणे सुरू केले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळा झालेल्या शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत दूध रस्त्यावर फेकत रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी आदी शेतमालासह दुधाला सरकारने योग्य भाव देत स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदने, पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्यासह शहर पोलिसांच्या चमुने आंदोलनस्थळ गाठले. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी उड्डाण पुलावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात डॉ. यशवंत सुरकार, दिलीप बुरांडे, धर्मराज बुरांडे, संजय नक्षीने, अनिल पोटदुखे, बंडू नंदनवार, धीरज वाटगुळे, अरुण मोहर्ले, विलास गुरनुले, प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.