शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे.

ठळक मुद्देसंतप्त सरपंचांचे आंदोलन : ठोस आश्वासनाअंती घेतली माघार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणने वर्धा शहराशेजारील सुमारे ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने या गावांमध्ये शुक्रवारी काळोखाचे सामाज्य होते. खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सरपंचांनी एकत्र येत महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनाअंती आंदोलन मागे घेतले.सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे. हीच थकबाकी वेळीच न अदा केल्याचे कारण पुढे करून महावितरणने शुक्रवारी वर्धा शहराशेजारील १३ तसेच तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. पथदिव्यांचा विद्युत पुरवठा अचानक खंडित केल्याने गावांमध्ये काळोख पसरला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या अडचण लक्षात घेता, सरपंचांनी एकत्र येत सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण, तेथे समाधान न झाल्याने आंदोलक सरपंचांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात वर्धा पंचायत समितीचे सभापती महेश आगे, जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत, बाळकृष्ण माऊसकर, पिपरी (मेघे)चे सरंपच अजय गौळकर, साटोडाचे सरपंच अजय जानवे, महाकाळचे सरपंच सुरेश गोहो, इंझापूरचे सरपंच दीपक तपासे, सिंदी (मेघे) च्या सरपंच प्रीती सवाई, म्हसाळ्याचे उपसरपंच संदेश किटे, उमरी (मेघे)चे सरपंच सचिन खोसे, बोरगाव (मेघे)चे सरपंच संतोष सेलूकर, ग्रामपंचायत सदस्य वंदना झामरे, कांता भगत, शारदा बावणे,  आदी सहभागी झाले होते.

२०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांत महावितरणचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक चर्चेदरम्यान २०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्यात येईल, असा निर्णय घेत तातडीने खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी एकमुखाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे रेटण्यात आली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही सहानुभूतीपूर्वक विचार केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज