शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीज जोडणीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे.

ठळक मुद्देसंतप्त सरपंचांचे आंदोलन : ठोस आश्वासनाअंती घेतली माघार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणने वर्धा शहराशेजारील सुमारे ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने या गावांमध्ये शुक्रवारी काळोखाचे सामाज्य होते. खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सरपंचांनी एकत्र येत महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनाअंती आंदोलन मागे घेतले.सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे. हीच थकबाकी वेळीच न अदा केल्याचे कारण पुढे करून महावितरणने शुक्रवारी वर्धा शहराशेजारील १३ तसेच तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. पथदिव्यांचा विद्युत पुरवठा अचानक खंडित केल्याने गावांमध्ये काळोख पसरला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या अडचण लक्षात घेता, सरपंचांनी एकत्र येत सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण, तेथे समाधान न झाल्याने आंदोलक सरपंचांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात वर्धा पंचायत समितीचे सभापती महेश आगे, जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत, बाळकृष्ण माऊसकर, पिपरी (मेघे)चे सरंपच अजय गौळकर, साटोडाचे सरपंच अजय जानवे, महाकाळचे सरपंच सुरेश गोहो, इंझापूरचे सरपंच दीपक तपासे, सिंदी (मेघे) च्या सरपंच प्रीती सवाई, म्हसाळ्याचे उपसरपंच संदेश किटे, उमरी (मेघे)चे सरपंच सचिन खोसे, बोरगाव (मेघे)चे सरपंच संतोष सेलूकर, ग्रामपंचायत सदस्य वंदना झामरे, कांता भगत, शारदा बावणे,  आदी सहभागी झाले होते.

२०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांत महावितरणचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक चर्चेदरम्यान २०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्यात येईल, असा निर्णय घेत तातडीने खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी एकमुखाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे रेटण्यात आली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही सहानुभूतीपूर्वक विचार केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज