शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ

By admin | Updated: July 17, 2016 00:26 IST

होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे.

शहरातून मोर्चा : वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकांचा सहभाग वर्धा : होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी होमगार्डच्यावतीने करण्यात आली होती. मात्र यावर शासनाच्यावतीने कुठलीही निर्णय घेण्यात आला नसल्याने गृहरक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार शनिवारपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या पुढाकारत होत असलेल्या या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकही सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी शहरात शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. शनिवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात वर्धेतील ५२२ आंदोलकांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती व अकोला येथील गृहरक्षक सहभागी झाल्याचे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे. या संदर्भात आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्यांची माहिती दिली. राज्यात १९४७ पासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक कार्यरत आहेत. राज्यभर पोलीस विभागातील पदे रिक्त असताना तुटपुंज्या मानधनावर गृहरक्षकांकडून काम करून घेण्यात येत आहे. यातही गृहरक्षकाकडून कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही. असे असताना राज्य शसनाच्यावतीने एक आद्यादेश काढत १२ वर्ष सेवा झालेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे फरमान सोडले. शासनाने घेतलेला हा निर्णय मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ व १९५३ मधील तरतुदीनुसार नसल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात आला आहे. हा निर्णय जर कायद्याच्या अनुरूप असता तर तो मान्य केला असता, असेही फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले. या संदर्भात फेडरेशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मात्र त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने वर्धेतून आंदोलनला प्रारंभ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)