शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा शिक्षणाकडे शाळांमध्ये कानाडोळा

By admin | Updated: November 26, 2014 23:10 IST

दरवर्षीच शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसतात़ या बदलाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते़ यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे़

विरूळ (आ़) : दरवर्षीच शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होताना दिसतात़ या बदलाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसते़ यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे़सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाने अक्षरश: वेड लावले आहे़ विविध वाहिन्यांवर चालणाऱ्या कार्टुन, गेम व अन्य खेळांत विद्यार्थी सुटीच्या दिवशी मग्न असतात़ पाठीवर दप्तराचा भार, शिकवणी वर्गाला हजेरी आदींचा विद्यार्थ्यांच्या मनावर भार वाढत असताना शैक्षणिक दृष्ट्या केवळ अभ्यासू होत आहेत़ यात शालेय अभ्यासक्रमातून क्रीडा शिक्षण हद्दपार झाल्याने त्याचा शारीरिक विकास होत नसल्याचे दिसून येते़ अनेक शाळांत यापूर्वी पीटीच्या वर्गात खेळण्याचे धडे दिले जात होते; पण आता शारीरिक शिक्षण हा विषय बंद झाला़ शिवाय विद्यार्थ्यांना पुरेसे मैदानही उपलब्ध नसल्याने शिक्षकही शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समित्यांना निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फतही काही निवडक गावांना क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ आर्वी तालुक्यातही पंचायत समिती स्तरावर १४ गावांना क्रींडागणासाठी निधी देण्यात आला होता़ यात १२ गावांची क्रींडागणे तयार करण्यात आलीत; पण यात संबंधित ग्रामसेवक, कंत्राटदार व पंचायत समितीच्या अभियंत्याने गैरप्रकार केल्याचे दिसते़ क्रींडागणाचे काम निकृष्ट झाल्याने ते अखेरच्या घटका मोजत आहे़ या क्रींडागणावर सध्या विद्यार्थी खेळताना तर नाही; पण गावातील जनावरे चरताना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत वाढले आहे़ यामुळे नेमके क्रीडांगण कुठे आहे, हे दिसून येत नाही़ क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ क्रीडांगण तयार करण्याची जबाबदारी पं़स़ शाखा अभियंता व ग्रामसेवकाकडे होती़ सध्या ग्रामीण भागातील क्रीडांगणेही लुप्त झाली आहेत आणि शाळांमध्येही शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे़ यामुळे बालकांचे आरोग्य राखण्यासाठी पालकांनाच विशेष प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसून येत आहे़(वार्ताहर)