शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

सकारात्मक वातावरणामुळे विकासकामांना गती

By admin | Updated: May 19, 2016 01:51 IST

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. असेच वातावरण राहिल्यास सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल,

आशुतोष सलील : मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप व नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागतवर्धा : जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. असेच वातावरण राहिल्यास सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल, असा विश्वास मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केला. तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रशासनातील सकारात्मक बदलाचा लाभ मला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.विकास भवन येथे मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निरोप तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी निलोत्पल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची उपस्थिती होती.मावळते जिल्हाधिकारी सलील यांचा नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांना सहसंचालक पदी अमरावती येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांनाही अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या हस्ते गौरविण्यात येऊन निरोप देण्यात आला. आभार तहसीलदार राहूल सारंग यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)विकास भवन परिसरात वृक्षारोपणनवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते विकास भवन परिसरात निसर्ग सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.