शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनसह संत्र्यावर अळ्यांचा हल्ला

By admin | Updated: July 29, 2015 02:06 IST

निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेल्या पिकांवर विविध अळ्या, रोग येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस येतो.

वर्धा : निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेल्या पिकांवर विविध अळ्या, रोग येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस येतो. सध्या सोयाबीनसह संत्रावर्गीय पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या पाहणीत समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. सेलसुरा, पडेगाव, सोनेगाव, लोणसावळी, वाटखेडा, बोपापूर सालोड, देवळी, आर्वी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सद्यस्थितीत सोयाबीन पिकावर उंटअळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिवाय अत्यल्प प्रमाणात चक्रीभुंगा, तंबाखूची पाने खाणारी अळी आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनवरील किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या पीक संरक्षण विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. सोयाबीन पिकावर सध्या ३०० च्या वर किड आढळून येतात. यातील १५ ते १८ किडीच आपल्या भागात नुकसान करताना आढळतात. यात तंबाखूची पाने खाणारी अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, केसाळ अळी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी आर्थिक नुकसानीची पातळी असताना फवारणी केल्यास लाभ होतो. यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कृषी विज्ञान केंद्राने सुचविल्या उपाययोजनानत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा. पिकात हेक्टरी २० ते २५ पक्षीथांबे उभारावे. तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे. चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. पाने खाणाऱ्या अळ्या चक्रीभुंगा व खोडमाशी या किडींनी अंडी घालू नये, यासाठी सुरूवातीलाच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. केसाळ अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात व त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही ५०० एलई विषाणू २ मिली प्रती लिटर पाणी वा नोमूरीया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी आढळून येताच करावी.किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच शेवटचा पर्याय म्हणून शिफारशीनुसार किटकनाशकाची फवारणी करावी. सद्यस्थितीत सोयाबीन पिकातील पानाच्या शिरा पिवळ्या पडलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर आढळून आले आहे. या उपाय म्हणून २०० ग्रॅम युरिया तसेच ५ टक्के निंबोळी अर्क वा ३०० पीपीएम निंबोळी अर्क ५० मिली पिकावर फवारणे शक्य आहे. असे केल्यास सोयाबीन पिकावरील पाने हिरवी होण्यास मदत होईल, अशा उपाययोजना कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. प्रदीप दवनेयांनी सुचविल्या आहेत.