शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीत ओलावा असल्यास पेरणी करा

By admin | Updated: June 11, 2015 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी.

वर्धा : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी. दुबार पेरणीत होणारा खर्च टाळण्यासाठी जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. बियाण्यांच्या उगवणक्षमतेची खात्री करून पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले.पेरणी केल्यावर बी उगवले नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. गत वर्षी याप्रकारामुळे काही शेतकऱ्यांना अतिरीक्त खर्च सहन करावा लागला होता. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी उताराला आडव्या दिशेने करावी. सलग समतल पद्धतीने पेरणी करावी. बीजप्रक्रिया करताना त्यामध्ये रायझोबिय, ट्रायकोडर्मा, त्वरीत विरघळणारे जिवाणू यांचा वापर करावा. यामुळे उगवण क्षमतेत वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. तसेच पिकाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करु नये. पेरणीसाठी ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. सोयाबीन पिकाची पेरणी करताना शक्यतो घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन केले आहे.उगवण क्षमतेची तपासणी करून बियाण्यांची पेरणी करावी. पावसातील खंडाचा पिकावर दुष्परिणाम होऊ नये, याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. चारा पिकांसाठी कृषी विभागामार्फत देण्यात आलेले मका बियाणे, बारमाही चारा उत्पादनासाठी तालुका बीज गुणन केंद्रावर उपलब्ध असलेल्या बारमाही गवताची लागवड करण्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती विचारावी. जिल्ह्यात कापूस पिकांसाठी १ हजार ३२० बेडमेकर उपलब्ध करून दिले आहेत. त्यादृष्टीने खते पेरणीद्वारे देऊन कपाशी पिकाची लागवड बेडच्या माथ्यावर न करता खालच्या बाजूने करावी. सोयाबीन पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ३८० रूंदसरी वरंभा यंत्रे उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड केल्यास बियाण्यांमध्ये २५ ते ३० टक्के बचत होते. पीक संवर्धन, मुलस्थानी जलसंधारण करता येत असल्याचे सांगितले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)