शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

जमिनीत ओलावा असल्यास पेरणी करा

By admin | Updated: June 11, 2015 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी.

वर्धा : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी. दुबार पेरणीत होणारा खर्च टाळण्यासाठी जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. बियाण्यांच्या उगवणक्षमतेची खात्री करून पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले.पेरणी केल्यावर बी उगवले नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. गत वर्षी याप्रकारामुळे काही शेतकऱ्यांना अतिरीक्त खर्च सहन करावा लागला होता. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी उताराला आडव्या दिशेने करावी. सलग समतल पद्धतीने पेरणी करावी. बीजप्रक्रिया करताना त्यामध्ये रायझोबिय, ट्रायकोडर्मा, त्वरीत विरघळणारे जिवाणू यांचा वापर करावा. यामुळे उगवण क्षमतेत वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. तसेच पिकाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करु नये. पेरणीसाठी ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. सोयाबीन पिकाची पेरणी करताना शक्यतो घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन केले आहे.उगवण क्षमतेची तपासणी करून बियाण्यांची पेरणी करावी. पावसातील खंडाचा पिकावर दुष्परिणाम होऊ नये, याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. चारा पिकांसाठी कृषी विभागामार्फत देण्यात आलेले मका बियाणे, बारमाही चारा उत्पादनासाठी तालुका बीज गुणन केंद्रावर उपलब्ध असलेल्या बारमाही गवताची लागवड करण्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती विचारावी. जिल्ह्यात कापूस पिकांसाठी १ हजार ३२० बेडमेकर उपलब्ध करून दिले आहेत. त्यादृष्टीने खते पेरणीद्वारे देऊन कपाशी पिकाची लागवड बेडच्या माथ्यावर न करता खालच्या बाजूने करावी. सोयाबीन पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ३८० रूंदसरी वरंभा यंत्रे उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड केल्यास बियाण्यांमध्ये २५ ते ३० टक्के बचत होते. पीक संवर्धन, मुलस्थानी जलसंधारण करता येत असल्याचे सांगितले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)