शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जमिनीत ओलावा असल्यास पेरणी करा

By admin | Updated: June 11, 2015 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी.

वर्धा : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी. दुबार पेरणीत होणारा खर्च टाळण्यासाठी जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. बियाण्यांच्या उगवणक्षमतेची खात्री करून पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले.पेरणी केल्यावर बी उगवले नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. गत वर्षी याप्रकारामुळे काही शेतकऱ्यांना अतिरीक्त खर्च सहन करावा लागला होता. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी उताराला आडव्या दिशेने करावी. सलग समतल पद्धतीने पेरणी करावी. बीजप्रक्रिया करताना त्यामध्ये रायझोबिय, ट्रायकोडर्मा, त्वरीत विरघळणारे जिवाणू यांचा वापर करावा. यामुळे उगवण क्षमतेत वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. तसेच पिकाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करु नये. पेरणीसाठी ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. सोयाबीन पिकाची पेरणी करताना शक्यतो घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन केले आहे.उगवण क्षमतेची तपासणी करून बियाण्यांची पेरणी करावी. पावसातील खंडाचा पिकावर दुष्परिणाम होऊ नये, याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. चारा पिकांसाठी कृषी विभागामार्फत देण्यात आलेले मका बियाणे, बारमाही चारा उत्पादनासाठी तालुका बीज गुणन केंद्रावर उपलब्ध असलेल्या बारमाही गवताची लागवड करण्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती विचारावी. जिल्ह्यात कापूस पिकांसाठी १ हजार ३२० बेडमेकर उपलब्ध करून दिले आहेत. त्यादृष्टीने खते पेरणीद्वारे देऊन कपाशी पिकाची लागवड बेडच्या माथ्यावर न करता खालच्या बाजूने करावी. सोयाबीन पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ३८० रूंदसरी वरंभा यंत्रे उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड केल्यास बियाण्यांमध्ये २५ ते ३० टक्के बचत होते. पीक संवर्धन, मुलस्थानी जलसंधारण करता येत असल्याचे सांगितले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)