शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

आंबटगोड टमाटरही देताहेत चटके

By admin | Updated: November 21, 2015 02:27 IST

सध्या तूर डाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील वरण बेपत्ता झाले आहे. आता त्याच्याा सोबतीला टमारटरही आले आहे.

महागाईची झळ कायम : नागरिकांना गावरान टमाट्याची प्रतीक्षावर्धा : सध्या तूर डाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील वरण बेपत्ता झाले आहे. आता त्याच्याा सोबतीला टमारटरही आले आहे. भाजीच्या चवीकरिता असलेल्या टमाटरचे दर पाहून त्याची आंबट गोड चव नागरिकांच्या जीभेला मिळणे कठीण झाले आहे. २० रुपये किलो दराने मिळत असलेले टमाटे दोन दिवस तब्बल ८० रुपयांवर पोहोचले होते. सध्या त्याचे दर ५० रुपयांवर स्थिरावले आहे. हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात अद्याप गारठा नसल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकांवरही होत आहे. जोपर्यंत गावरान टमाटर बाजारपेठेत दाखल होणार नाही तोपर्यंत भाव उतरणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. यामुळे नागरिकांना गावरान टमाटरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. रोजच्या जेवणाची चव वाढविण्याकरिता टमाटर महत्त्वाचे ठरत आहे. कुठलीही भाजी असो वा चटणी त्यात टमाटर असल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. परिणामी भाजीबाजारात भाजी घेण्यासाठी गेलेल्या गृहिणी टमाटरचे दर पाहून त्याची खरेदी करावी अथवा नाही, याचा विचार करीत आहेत. जिल्ह्यात वर्षभर टमाटरचे पीक हे तितकेसे होत नाही. केवळ हिवाळ्यातच मुबलक प्रमाणात टमाटरची आवक होत असते. त्यातही वर्षभर नागरिकांना टमाटर खायला मिळत असले तरी त्याची चव ही गावरान टमाटरसारखी आंबट नसते. त्यामुळे वर्षभर आपण केवळ टमाटर खातो या भावनेवर नागरिकांना समाधान मानावे लागते. गावरान टमाटर हे केवळ हिवाळ्यातच उत्पादित होत असल्याने त्याची चवही केवळ हिवाळ्यातच चाखायला भेटते. परंतु नोव्हेंबर महिना लोटूनही अद्याप गावरान टमाटर पाहिजे त्या प्रमाणात पालावर आलेले नाही. त्यामुळेच दरवर्षी हिवाळ्यात दरवर्षी घसरणारे टमाटरचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनाही गावरान टमाटरची प्रतीक्षा कायम आहे.(शहर प्रतिनिधी)करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे विलंबदरवर्षी सहसा नोव्हेंबर महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवतो. त्यामुळे या महिन्याच्या प्रारंभीच वाजारपेठेत गावरान टमाटर दाखल होतात. परंतु यंदा टमाटर पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने महिनाभरापूर्वी आलेला बहर गळून गेला. परिणामी टमाटर बाजारपेठेत दाखल होण्यास विलंब होत आहे. गावरान टमाटर जास्त पौष्टिकहिवाळ्यात उत्पादित येणारे गावरान टामाटर हे जास्त आंबट, चविष्ट आणि पौष्टिक असतात. त्या तुलनेत रसायनयुक्त टमाटर हे तितकेसे पौष्टिक नसतात. तसेच हिवाळ्यात ते अत्यल्प दरातही उपलब्ध होतात.