शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांनी विकसित केली सौर उर्जेवर चालणारी घंटागाडी

By admin | Updated: June 6, 2017 01:12 IST

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून ...

यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा समाजाला उपयोगी संशोधनाला हातभार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून एका विशिष्ट ठिकाणी तो गोळा करण्याचे कार्य तीनचाकीच्या माध्यमातून प्रत्येक शहरात करण्यात येते. मात्र ही तीन चाकी व्यक्तीच्या चालवणाऱ्यावर अवलंबून असल्याने वेळ व मोठे परिश्रम यामध्ये व्यर्थ होते. यावर मार्ग काढण्याकरिता बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंंजिनिअरींग विभागातील अंतीम वर्षातील कुणाल पिपरे, नंदकिशोर गव्हाळे, राहुल निशाने, प्रिया सोडवाले, तेजस्विनी वावरे, तेजस एस. सागर उकळकर, दिपाली मेंढे या विद्यार्थ्यांनी सोलर उर्जेवर चालणारी तीन चाकी विकसित केली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना विभागप्रमुख व या प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. आर.जी. श्रीवास्तव म्हणाले की, घरातील कचरा ज्या गाडीमध्ये आणून टाकला जातो ती तीन चाकी असलेली कचरा गाडी सर्वाच्या परिचित असते. गाडी वेळेवर का येत नाही असे बऱ्याचदा आपण कचरा गाडी वाहकाला विचारत असतो. वेळेच नियोजन होत नसल्याने कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. याकरिता पॅडल न मारता ई-रिक्षा तयार होतो काय याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधन केले. बारकावे काय आहेत, अडचणी काय येतील याचा अभ्यास करून एक उत्तमरित्या सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी ज्याला ई-रिक्शा म्हणता येईल अशी सायकल विकसित केली. यामध्ये २०० व्हॅटचे सोलर पॅनल वरच्या बाजुने लावण्यात आले असून खाली बॅटरी बसविण्यात आली आहे. शिवाय ब्रसलेस डिसी मोटर, कंट्रोलर, थ्रॉटल असे इलेक्ट्रीक सर्कीट जोडण्यात आले आहे. १९० किलो कचरा ही गाडी विना पॅडल न मारता केवळ हॅण्डल मॅनेज करुन व्यक्ती ओढू शकेल अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होईल. वेळेत त्या त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील तशी सौर पॅनल मुळे बॅटरी दिवसभर चार्ज होत राहील. आणि कचरा संकलन करण्याचे काम जलदगतीने होवून शहरातील कचरा संकलनाचे नियोजन व्यवस्थितरित्या होत नाही. ही संकल्पना वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामोद्योग संस्थेच्या सहकार्याने साकार झाली असून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन याकरिता लाभले. विशेष म्हणजे तीन चाकीकरिता प्रायोजकत्व सुद्धा एमगिरीने दिले. लवकरच नगरपालिकांमध्ये याचे प्रात्यक्षिक केले जाणार असून वर्धेच्या नगरपरिषदेला हस्तांरण होवू शकते असा आशावाद डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनी सदर संशोधन समाजपयोगी असून शेतीउपयोगी आणि समाजपयोगी संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन करण्यात येत असल्याचे सांगितले. गत वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने सौर उर्जेवर चालणारी दिव्यांगासाठी तीन चाकी सायकल विकसित केली असून आज त्याचा दिव्यांग घेत आहे. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. समाजपयोगी संशोधनाला हातभार लावून अधिकाधिक संशोधन करण्याचा मानस सदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.