शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी विकसित केली सौर उर्जेवर चालणारी घंटागाडी

By admin | Updated: June 6, 2017 01:12 IST

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून ...

यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा समाजाला उपयोगी संशोधनाला हातभार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून एका विशिष्ट ठिकाणी तो गोळा करण्याचे कार्य तीनचाकीच्या माध्यमातून प्रत्येक शहरात करण्यात येते. मात्र ही तीन चाकी व्यक्तीच्या चालवणाऱ्यावर अवलंबून असल्याने वेळ व मोठे परिश्रम यामध्ये व्यर्थ होते. यावर मार्ग काढण्याकरिता बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंंजिनिअरींग विभागातील अंतीम वर्षातील कुणाल पिपरे, नंदकिशोर गव्हाळे, राहुल निशाने, प्रिया सोडवाले, तेजस्विनी वावरे, तेजस एस. सागर उकळकर, दिपाली मेंढे या विद्यार्थ्यांनी सोलर उर्जेवर चालणारी तीन चाकी विकसित केली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना विभागप्रमुख व या प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. आर.जी. श्रीवास्तव म्हणाले की, घरातील कचरा ज्या गाडीमध्ये आणून टाकला जातो ती तीन चाकी असलेली कचरा गाडी सर्वाच्या परिचित असते. गाडी वेळेवर का येत नाही असे बऱ्याचदा आपण कचरा गाडी वाहकाला विचारत असतो. वेळेच नियोजन होत नसल्याने कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. याकरिता पॅडल न मारता ई-रिक्षा तयार होतो काय याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधन केले. बारकावे काय आहेत, अडचणी काय येतील याचा अभ्यास करून एक उत्तमरित्या सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी ज्याला ई-रिक्शा म्हणता येईल अशी सायकल विकसित केली. यामध्ये २०० व्हॅटचे सोलर पॅनल वरच्या बाजुने लावण्यात आले असून खाली बॅटरी बसविण्यात आली आहे. शिवाय ब्रसलेस डिसी मोटर, कंट्रोलर, थ्रॉटल असे इलेक्ट्रीक सर्कीट जोडण्यात आले आहे. १९० किलो कचरा ही गाडी विना पॅडल न मारता केवळ हॅण्डल मॅनेज करुन व्यक्ती ओढू शकेल अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होईल. वेळेत त्या त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील तशी सौर पॅनल मुळे बॅटरी दिवसभर चार्ज होत राहील. आणि कचरा संकलन करण्याचे काम जलदगतीने होवून शहरातील कचरा संकलनाचे नियोजन व्यवस्थितरित्या होत नाही. ही संकल्पना वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामोद्योग संस्थेच्या सहकार्याने साकार झाली असून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन याकरिता लाभले. विशेष म्हणजे तीन चाकीकरिता प्रायोजकत्व सुद्धा एमगिरीने दिले. लवकरच नगरपालिकांमध्ये याचे प्रात्यक्षिक केले जाणार असून वर्धेच्या नगरपरिषदेला हस्तांरण होवू शकते असा आशावाद डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनी सदर संशोधन समाजपयोगी असून शेतीउपयोगी आणि समाजपयोगी संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन करण्यात येत असल्याचे सांगितले. गत वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने सौर उर्जेवर चालणारी दिव्यांगासाठी तीन चाकी सायकल विकसित केली असून आज त्याचा दिव्यांग घेत आहे. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. समाजपयोगी संशोधनाला हातभार लावून अधिकाधिक संशोधन करण्याचा मानस सदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.