शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

विद्यार्थ्यांनी विकसित केली सौर उर्जेवर चालणारी घंटागाडी

By admin | Updated: June 6, 2017 01:12 IST

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून ...

यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा समाजाला उपयोगी संशोधनाला हातभार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून एका विशिष्ट ठिकाणी तो गोळा करण्याचे कार्य तीनचाकीच्या माध्यमातून प्रत्येक शहरात करण्यात येते. मात्र ही तीन चाकी व्यक्तीच्या चालवणाऱ्यावर अवलंबून असल्याने वेळ व मोठे परिश्रम यामध्ये व्यर्थ होते. यावर मार्ग काढण्याकरिता बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंंजिनिअरींग विभागातील अंतीम वर्षातील कुणाल पिपरे, नंदकिशोर गव्हाळे, राहुल निशाने, प्रिया सोडवाले, तेजस्विनी वावरे, तेजस एस. सागर उकळकर, दिपाली मेंढे या विद्यार्थ्यांनी सोलर उर्जेवर चालणारी तीन चाकी विकसित केली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना विभागप्रमुख व या प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. आर.जी. श्रीवास्तव म्हणाले की, घरातील कचरा ज्या गाडीमध्ये आणून टाकला जातो ती तीन चाकी असलेली कचरा गाडी सर्वाच्या परिचित असते. गाडी वेळेवर का येत नाही असे बऱ्याचदा आपण कचरा गाडी वाहकाला विचारत असतो. वेळेच नियोजन होत नसल्याने कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. याकरिता पॅडल न मारता ई-रिक्षा तयार होतो काय याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधन केले. बारकावे काय आहेत, अडचणी काय येतील याचा अभ्यास करून एक उत्तमरित्या सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी ज्याला ई-रिक्शा म्हणता येईल अशी सायकल विकसित केली. यामध्ये २०० व्हॅटचे सोलर पॅनल वरच्या बाजुने लावण्यात आले असून खाली बॅटरी बसविण्यात आली आहे. शिवाय ब्रसलेस डिसी मोटर, कंट्रोलर, थ्रॉटल असे इलेक्ट्रीक सर्कीट जोडण्यात आले आहे. १९० किलो कचरा ही गाडी विना पॅडल न मारता केवळ हॅण्डल मॅनेज करुन व्यक्ती ओढू शकेल अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होईल. वेळेत त्या त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील तशी सौर पॅनल मुळे बॅटरी दिवसभर चार्ज होत राहील. आणि कचरा संकलन करण्याचे काम जलदगतीने होवून शहरातील कचरा संकलनाचे नियोजन व्यवस्थितरित्या होत नाही. ही संकल्पना वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामोद्योग संस्थेच्या सहकार्याने साकार झाली असून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन याकरिता लाभले. विशेष म्हणजे तीन चाकीकरिता प्रायोजकत्व सुद्धा एमगिरीने दिले. लवकरच नगरपालिकांमध्ये याचे प्रात्यक्षिक केले जाणार असून वर्धेच्या नगरपरिषदेला हस्तांरण होवू शकते असा आशावाद डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनी सदर संशोधन समाजपयोगी असून शेतीउपयोगी आणि समाजपयोगी संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन करण्यात येत असल्याचे सांगितले. गत वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने सौर उर्जेवर चालणारी दिव्यांगासाठी तीन चाकी सायकल विकसित केली असून आज त्याचा दिव्यांग घेत आहे. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. समाजपयोगी संशोधनाला हातभार लावून अधिकाधिक संशोधन करण्याचा मानस सदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.