शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सहा वर्षांपासून रेल्वे पूल अपूर्णच

By admin | Updated: December 30, 2016 00:29 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील रेल्वे गेट क्रमांक १४ चे काम सुरू झाले. त्या कामाला २०१० पासून ब्रेक बसला.

दररोज तासनतास वाहनांच्या रांगा : शासनाचे लेखी आश्वासन हवेतच विरले हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील रेल्वे गेट क्रमांक १४ चे काम सुरू झाले. त्या कामाला २०१० पासून ब्रेक बसला. या काळात रखडलेले काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हा मार्ग अतिशय वर्दळीचा असून येथे दररोज वाहनाच्या रांगा असतात. सदर काम पूर्ण करण्याकरिता येथील नागरिकांनी शासनाला निवेदन देत अनेक वेळा आंदोलने केली. यावेळी सदर पुलाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हे लेखी आश्वासन हवेतच विरले. यामुळे गुरुवारी येथील संतप्त नागरिकांनी पुन्हा रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वे पुलाचे काम गत अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. सन २०१० मध्ये या पुलाच्या व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. संपूर्ण काम अद्यापही पुर्णत्वाला आले नाही. याबाबत नागरिकांना बरेच वेळा निवेदन दिले होते. त्यावेळी रेल्वे कार्यालयाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसते. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा २१ जानेवारी २०१६ रोजी निवेदन दिले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे कळविले होते. तरीही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी मे २०१६ मध्ये नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते; परंतु डिसेंबर २०१६ संपत असून अद्यापही पुलाचे काम अर्धवटच आहे. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गाड्या, आम नागरिक, शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गेटवर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. येथून सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. यापूर्वी याच उडाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात सुद्धा झाले आहे. वेळोवेळी रेल्वे फाटक बंद होत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. यामुळे आम नागरिकांना व प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनोज उपासने, जगदीश प्रसाद शुक्ला, प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, विनोद कुंभारे, भाऊराव कोटकर, अ‍ॅड. अनिता जोशी, संदेश थुल, राकेश नगरवार, विजय मोहता, संजय हावगे, अजय देवढे, नरेंद्र चुबंडे, राजू अरगुले, भारत पवार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)