शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

By admin | Updated: December 28, 2016 00:50 IST

बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला.

सेवाग्राम : बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला. यात विविध धार्मिक कार्यक्रमासह भजन, देवजागर, कीर्तन, भारूड व पालखी सोहळा असे कार्यक्रम झाले. शुक्रवारी माया रोकडे तांच्या हस्ते कलशस्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ केला. यानंतर एकादशीला मुर्तीची महापूजा अतुल तुपकर यांच्या हस्ते करण्यात आली. यासह काकडा, भजन, सकाळी व रात्री आरती, हरिपाठ तसेच राष्ट्रीय कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाला. शनिवारी सामुदायिक कीर्तन झाले. प्रशांत महाराज चलाख यांनी मार्गदर्शन केले. तसेच रविवारी राहूल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळीच्या साथीने नागरिक सहभागी झाले होते. भजन मंडळी, करंजी (भोगे), भजन मंडळी सोहमनगर, भजन मंडळ पहेलानपूर व खापरी (ढोणे), यासह बापुनगर, टेलीकॉमनगर, डॉक्टर कॉलनी, म्हाडा कॉलनी, वरूड रेल्वे जूनी वस्ती येथील भजनी मंडळी सहभागी झाली होती. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी आरती ओवाळून स्वागत केले. महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता. पालखी सोहळ्यानंतर दहिहांडी कार्यक्रम राहुल महाराज हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरणात पाहायला मिळाले. गावकरी व महिलांचा यात सहभाग होता. दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी) श्रीमद भागवत कथा सप्ताहात प्रवचन सेवाग्राम : जुन्या वस्तीतील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे अखंड ज्ञानयज्ञ संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे. यात कथा प्रवचन आयोजित करण्यात आले. भाविकांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन केले. आरती झाल्यानंतर रात्रीला हवन व पुजन झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. कथा प्रवक्ता केशवस्वामी सारंग चैत्यन्य महाराज, (अमरावती) आहे. भारतीय संस्कृती व परंपराचे ज्ञान शिक्षणासोबत गुरूकुलात विद्यार्थ्यांना दिले जात असे. आजही अशाच शिक्षणासाठी विद्यार्थी माधुकरी मागून आपले शिक्षण पूर्ण करतात. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह असे म्हणतो. ज्यात माधुर्य आहे आणि देणारा किंवा देणारी सहृदयी आहे. त्याचा लाभ दोघांनाही होतो. त्या भोजनाच गोडवा काही औरच असतो. भगवंतासाठी गरीब सुध्दा पोहे नेतो. भगवंत ते आवडीने खातात. यातून मैत्री आपल्याला दिसून येते. खऱ्या मैत्रीभावात गरीब श्रीमंत अशी भावना नसते. भारतात वर्णव्यवस्था होती. पण आपण समदृष्टीच्या भावनेने सर्वांशी जुळलो आहे. धर्म, संस्कृतीचे विस्मरणाने नैतिकतेचे पतन आहे. त्यामुळे मन सुन्न करणाऱ्या घटना समाजात होताना दिसतात. भगवंताला शरण जात मर्यादेत जीवन जगावे.