शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

By admin | Updated: December 28, 2016 00:50 IST

बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला.

सेवाग्राम : बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला. यात विविध धार्मिक कार्यक्रमासह भजन, देवजागर, कीर्तन, भारूड व पालखी सोहळा असे कार्यक्रम झाले. शुक्रवारी माया रोकडे तांच्या हस्ते कलशस्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ केला. यानंतर एकादशीला मुर्तीची महापूजा अतुल तुपकर यांच्या हस्ते करण्यात आली. यासह काकडा, भजन, सकाळी व रात्री आरती, हरिपाठ तसेच राष्ट्रीय कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाला. शनिवारी सामुदायिक कीर्तन झाले. प्रशांत महाराज चलाख यांनी मार्गदर्शन केले. तसेच रविवारी राहूल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळीच्या साथीने नागरिक सहभागी झाले होते. भजन मंडळी, करंजी (भोगे), भजन मंडळी सोहमनगर, भजन मंडळ पहेलानपूर व खापरी (ढोणे), यासह बापुनगर, टेलीकॉमनगर, डॉक्टर कॉलनी, म्हाडा कॉलनी, वरूड रेल्वे जूनी वस्ती येथील भजनी मंडळी सहभागी झाली होती. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी आरती ओवाळून स्वागत केले. महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता. पालखी सोहळ्यानंतर दहिहांडी कार्यक्रम राहुल महाराज हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरणात पाहायला मिळाले. गावकरी व महिलांचा यात सहभाग होता. दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी) श्रीमद भागवत कथा सप्ताहात प्रवचन सेवाग्राम : जुन्या वस्तीतील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे अखंड ज्ञानयज्ञ संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे. यात कथा प्रवचन आयोजित करण्यात आले. भाविकांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन केले. आरती झाल्यानंतर रात्रीला हवन व पुजन झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. कथा प्रवक्ता केशवस्वामी सारंग चैत्यन्य महाराज, (अमरावती) आहे. भारतीय संस्कृती व परंपराचे ज्ञान शिक्षणासोबत गुरूकुलात विद्यार्थ्यांना दिले जात असे. आजही अशाच शिक्षणासाठी विद्यार्थी माधुकरी मागून आपले शिक्षण पूर्ण करतात. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह असे म्हणतो. ज्यात माधुर्य आहे आणि देणारा किंवा देणारी सहृदयी आहे. त्याचा लाभ दोघांनाही होतो. त्या भोजनाच गोडवा काही औरच असतो. भगवंतासाठी गरीब सुध्दा पोहे नेतो. भगवंत ते आवडीने खातात. यातून मैत्री आपल्याला दिसून येते. खऱ्या मैत्रीभावात गरीब श्रीमंत अशी भावना नसते. भारतात वर्णव्यवस्था होती. पण आपण समदृष्टीच्या भावनेने सर्वांशी जुळलो आहे. धर्म, संस्कृतीचे विस्मरणाने नैतिकतेचे पतन आहे. त्यामुळे मन सुन्न करणाऱ्या घटना समाजात होताना दिसतात. भगवंताला शरण जात मर्यादेत जीवन जगावे.