शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सात वर्षांपासून विस्ताराचे भिजत घोंगडे

By admin | Updated: October 23, 2016 02:19 IST

परिसराचा विकास व रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्यावतीने अनेक अभियान जाहीर करण्यात येत आहे.

कारंजा एमआयडीसी : ११५ शेतकऱ्यांची २४२.५ हेक्टर जमीन अधिग्रहित करणारअरुण फाळके  कारंजा (घाडगे)परिसराचा विकास व रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्यावतीने अनेक अभियान जाहीर करण्यात येत आहे. असे असताना २००६ मध्ये कारंजा तालुक्याच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या विस्ताराची योजना २०१० पासून धूळखात पडलेली आहे. विस्तारीकरणासाठी २४२.५२ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात सूचना निर्गमित केली आहे. ती तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांना मिळाली; पण प्रत्यक्ष जमिनी कोणत्या भावाने घेणार व कधी घेणार, याबाबत शासनाचा निर्णय झाला नाही. यामुळे येथील औद्योगिक क्षेत्र विकसित होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नोटीफिकेशन जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी इतरत्र विकता येत नाही. त्यांचा विकास करता येत नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद झाले आहेत. यामुळे संबंधित शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली तरी त्यांच्यावतीने कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. जवळपास १ लाख लोकसंख्या आणि ९० गावे असलेल्या कारंजा तालुक्यात एकही मोठा उद्योग किंवा कारखाना नाही. तालुक्याची ३५ टक्के जमीन जंगलव्याप्त आहे. पोत खडकाळ व नापिक आहे. एकही बारामाही वाहणारी नदी नाही, सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने ७० टक्के जमीन कोरडवाहू आहे. एकमेव असलेला शेती व्यवसाय येथे आहे. तोही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी आणि युवकांच्या हातांना काम व रोजगार मिळण्यासाठी येथे मोठ्या एमआयडीसीची निर्मिती होणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून सन २००६ या एमआयडीसीसाठी केवळ ८.४६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. श्रीमंत उद्योगपती व नेते मंडळीच्या नातेवाईकांना नाममात्र म्हणजे २ ते ३ रुपये चौरस फुटाप्रमाणे जमिनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर हे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी पुन्हा २३४ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्याचे नोटीफीकेशन २०१० मध्ये काढण्यात आले होते. कारंजा तालुक्याच्या ११५ शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्यात; पण जमिनीचा भाव किती व कसा द्यायचा, हे अद्यापही ठरलेले नाही. परिणामी, अधिग्रहणाचे भिजत घोंगडे कायम आहे. अधिग्रहीत जमिनीचा मोबदला कायदा २०१४ प्रमाणे द्यायचा की २०१३ प्रमाणे, यावर विचार विनिमय करण्याकरिता शासनाने तब्बल ५ वर्षांनी म्हणजे ३० सप्टेंबर २०१५ मध्ये तहसील कार्यालयात पहिली सभा ठरविली होती; पण न.प. च्या आचार संहितेमुळे ती रद्द झाली. यानंतर दुसरी मिटींग ७ जानेवारी २०१६ रोजी तहसील कार्यालयात झाली. सर्व शेतकरी जातीने हजर होते; पण पण संबंधित एमआयडीसीचे अधिकारी आणि आर्वी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याची तसदी घेतली नाही. प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण आणि एमआयडीसीचे कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही उपस्थित शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहण कायदा २०१४ प्रमाणे वाटाघाटी करून जमिनीची किंमत ठरविण्याची संमती दिली. एक महिन्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांना हजर ठेवून प्रकरण निकाली काढण्याची ग्वाही दिली. याला नऊ महिने झाले तरी अद्याप सभा झाली नाही. एकंदरीत शासन शेतकऱ्यांसोबत खेळच करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारंजा शहर महामार्ग क्रमांक ६ वर नागपूर-अमरावतीच्या मध्यभागी आहे. औद्योगिक विकासाला चांगला वाव आहे. एमआयडीसीसाठी पाण्याची सोय नाही, असे कारण शासन समोर करीत आहे. येथे खैरी धरणावरून पाणी आणले जाऊ शकते. पाण्याची सोय जर नव्हती तर ही जागा कशी निवडली, हाही प्रश्नच आहे. शासनाने या औद्योगिक वसाहतीबाबत त्वरित कारवाई न केल्यास शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे तालुका सचिव अजय भोकरे यांनी मुख्यमंत्री तसेच वाहतूक मंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. जमिनीच्या दराबाबत संभ्रमकारंजा येथे होणार असलेल्या या एमआयडीसीकरिता जमिनी अधिग्रहन करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना मिळाल्या. या सूचनेनुसार येथे एक सभाही झाली. या सभेत शेतकऱ्यांनी त्यांना मिळणारे दर २०१४ च्या नियमानुसार देण्याची मागणी केली. असे असताना या दरासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.