शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत छोडो’ लढ्याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:49 IST

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे.

ठळक मुद्दे७७ वर्षांपूर्वी आंदोलनाची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यदिनाला होणार ७३ वर्षे

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. ‘भारत छोडो’ या घोषणेचे बिजारोपण सेवाग्राम आश्रमात झाल्याने भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात या घटनेला आणि स्मारकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आश्रम विविध संघटना, गांधी विचारक, चळवळीत काम करणाऱ्यांत आणि पर्यटकांसाठी क्रांतीचे स्फुल्लिंग निर्माणाचे काम करीत आहेत.सेवाग्राम आश्रमची स्थापना ग्रामीण लोकांची सेवा करणे आणि ग्रामोद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली असली तरी कालांतराने मात्र कार्यकर्त्यांची संख्या वाढली. रचनात्मक कार्य आणि बापूंची प्रयोग भूमी बनली. आश्रमातून देशासाठी कार्यकर्ते घडावे आणि स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करावे, हा सुद्धा या मागे बापूंचा विचार होता. कार्यकर्त्यांच्या गरजा भागविण्यासाठी आश्रमात तसेच जवळच उभारण्यात आलेल्या ग्रामोद्योगाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात असे. बापूंचा आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि विदेशातील बापूंना मानणारे येत असे. सभा आणि बैठका होऊन देशाच्या कार्याची, सत्याग्रहाची आणि आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येत असे.आश्रमातील पहिली कुटी म्हणजे आताची आदी निवास या नावाने ओळखली जाते. याच कुटीत ‘भारत छोडो’चा मसुदा तयार करण्यात आलेला होता. त्यामुळे या कुटीला ऐतिहासिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. वर्ध्यात १४ जुलै १९४२ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई आणि सहकारी रवाना झाले. तत्पूर्वी बा ने बकुळीचे झाड लावले होते. ७ व ८ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला आणि ८ ला सायंकाळी गवालिया टँकवरील जाहीर सभेत मौलाना अबुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजींची भाषणे होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या वतीने ‘चले जाव’ची घोषणा केल्या गेली आणि ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हातात सोपवून ब्रिटिशांना भारत सोडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. ९ आॅगस्टला देशभरात भारत छोडोचे आंदोलन होणार होते. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पहाटेच गांधीजी, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि अनेक नेत्यांना अटक करण्यात येऊन पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. आंदोलनाची सूत्रे कस्तुरबा यांनी हातात घेऊन आंदोलन सहकाºयांसोबत सुरूच ठेवले.भारतीय इतिहासात ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस महत्त्वाचा ठरून क्रांतीदिनाची नोंद झाली; पण या क्रांतीदिनाचे बिजारोपण आश्रमात होऊन त्याचा साक्षीदार आदि निवास आहे. नव्या पिढीसमोर हा इतिहास असला तरी प्रेरणादायी मात्र नक्कीच ठरणारा आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम