शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

वर्धेचे तालुका कृषी कार्यालय केले सील

By admin | Updated: August 27, 2016 00:20 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत

न्यायालयाचे आदेश : पुरावे गहाळ होण्याचा संशयवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कार्यालयातील दस्तऐवज लंपास होण्याची शक्यता असल्याच्या कारणाने वर्धेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारपर्यंत सील ठोकावे असे आदेश, जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने सायंकाळी सील ठोकण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. तत्पूर्वी अटक असलेल्या तिनही आरोपींकडून त्यांच्या कार्यालयात असलेल्या या कामांची कागदपत्रे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. अटक असलेल्या सुनील सुटे, स्वप्निल शेळके व उल्हास नाडे या तिघांना लाच स्वीकारताना बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामुळे या तिघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. लाचलुचपत विभागाच्यावतीने या आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांनी रवानगी न्यायालयीन कोठडीत करीत जामिनावर सुटका केली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असल्याने त्याच्यावतीने कार्यालयातील कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता लाचलुचपत प्रबिधंक विभागाकडून वर्तविण्यात आली. याची दखल घेत न्यायाधीयश अनिरुद्ध चांदेकर यांनी तालुका कृषी कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश दिले. सध्या चार जणांच्या असलेल्या या श्रृंखलेत आणखी आरोपी आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी ज्या कामांची देयके मंजूर केली त्या कामांशी संबंधीत कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरू होती. या कागदत्रातून अटकेत असलेल्या आरोपींकडून जलशिवार योजनेत झालेल्या कामांत किती रुपयांचा घोळ झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न असून यात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात असलेल्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कामांना मंजुरी देत देयके आदा केली आहेत; याच्या हिशेबाचीही तपासणी होणार आहे. यात जर त्यांनी ३० टक्क्यांच्या हिशेबाने कमीशन घेतले असेल तर त्यांच्या खात्यात किती रक्कम गेली याचाही तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)