शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

वर्धेचे तालुका कृषी कार्यालय केले सील

By admin | Updated: August 27, 2016 00:20 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत

न्यायालयाचे आदेश : पुरावे गहाळ होण्याचा संशयवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कार्यालयातील दस्तऐवज लंपास होण्याची शक्यता असल्याच्या कारणाने वर्धेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारपर्यंत सील ठोकावे असे आदेश, जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने सायंकाळी सील ठोकण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. तत्पूर्वी अटक असलेल्या तिनही आरोपींकडून त्यांच्या कार्यालयात असलेल्या या कामांची कागदपत्रे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. अटक असलेल्या सुनील सुटे, स्वप्निल शेळके व उल्हास नाडे या तिघांना लाच स्वीकारताना बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामुळे या तिघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. लाचलुचपत विभागाच्यावतीने या आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांनी रवानगी न्यायालयीन कोठडीत करीत जामिनावर सुटका केली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असल्याने त्याच्यावतीने कार्यालयातील कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता लाचलुचपत प्रबिधंक विभागाकडून वर्तविण्यात आली. याची दखल घेत न्यायाधीयश अनिरुद्ध चांदेकर यांनी तालुका कृषी कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश दिले. सध्या चार जणांच्या असलेल्या या श्रृंखलेत आणखी आरोपी आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी ज्या कामांची देयके मंजूर केली त्या कामांशी संबंधीत कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरू होती. या कागदत्रातून अटकेत असलेल्या आरोपींकडून जलशिवार योजनेत झालेल्या कामांत किती रुपयांचा घोळ झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न असून यात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात असलेल्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कामांना मंजुरी देत देयके आदा केली आहेत; याच्या हिशेबाचीही तपासणी होणार आहे. यात जर त्यांनी ३० टक्क्यांच्या हिशेबाने कमीशन घेतले असेल तर त्यांच्या खात्यात किती रक्कम गेली याचाही तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)