शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेचे तालुका कृषी कार्यालय केले सील

By admin | Updated: August 27, 2016 00:20 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत

न्यायालयाचे आदेश : पुरावे गहाळ होण्याचा संशयवर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देयके काढण्याकरिता ३० टक्केच्या नावावर लाच मागणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कार्यालयातील दस्तऐवज लंपास होण्याची शक्यता असल्याच्या कारणाने वर्धेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारपर्यंत सील ठोकावे असे आदेश, जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने सायंकाळी सील ठोकण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. तत्पूर्वी अटक असलेल्या तिनही आरोपींकडून त्यांच्या कार्यालयात असलेल्या या कामांची कागदपत्रे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. अटक असलेल्या सुनील सुटे, स्वप्निल शेळके व उल्हास नाडे या तिघांना लाच स्वीकारताना बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामुळे या तिघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. लाचलुचपत विभागाच्यावतीने या आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांनी रवानगी न्यायालयीन कोठडीत करीत जामिनावर सुटका केली आहे. यातील एक आरोपी अद्याप फरार असल्याने त्याच्यावतीने कार्यालयातील कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता लाचलुचपत प्रबिधंक विभागाकडून वर्तविण्यात आली. याची दखल घेत न्यायाधीयश अनिरुद्ध चांदेकर यांनी तालुका कृषी कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश दिले. सध्या चार जणांच्या असलेल्या या श्रृंखलेत आणखी आरोपी आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी ज्या कामांची देयके मंजूर केली त्या कामांशी संबंधीत कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरू होती. या कागदत्रातून अटकेत असलेल्या आरोपींकडून जलशिवार योजनेत झालेल्या कामांत किती रुपयांचा घोळ झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न असून यात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात असलेल्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कामांना मंजुरी देत देयके आदा केली आहेत; याच्या हिशेबाचीही तपासणी होणार आहे. यात जर त्यांनी ३० टक्क्यांच्या हिशेबाने कमीशन घेतले असेल तर त्यांच्या खात्यात किती रक्कम गेली याचाही तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)