शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

ग्रामीण भागात पाण्यासह वैरणाचाही प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

खुबगाव : पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. पाण्याच्या समस्येसोबत जनावरांच्या वैरणाचा प्रश्नही अधिक गंभीर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या भयावह स्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या भागात सिंचन व्यवस्था नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील गावांना याचा फटका सहन करावा लागतो. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटू शकली नाही. भुजल पातळी चांगली असतानाही शासकीय यंत्रणेने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या भागात एकही प्रकल्प उभारल्या गेला नाही. त्यामुळे आज ही परिस्थती निर्माण झाली आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी प्रलंबित आहे.

प्रत्येक वर्षी थातूर-मातूर योजना राबविली जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र त्याचे फलित होत नाही. योजनेवर आजवर झालेला खर्च लक्षात पाहता या निधीतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना अंमलात येवू शकली असती. परंतु याकडे कुणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आजही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागते. या भागात पाण्याची मुबलकता आहे. पण पाणी नागरिकांपर्यंत पोहचविण्याची यंत्रणा नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागाची स्थिती दयनीय होत असून कमी अधिक पावसामुळे पिके, चारा यावर दुष्परिणाम झाला. शेतकरी, शेतमजूर कर्जबाजारी होऊन आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे कवडीमोल दराने जनावरे विक्री काढावी लागते. निसर्गही हुलकावनी देत असल्याने शेतकरी हतबल झाला. जनावरांकरिता चारा व पाणी नाही. शेतकर्‍यांना जनावरे कशी पाळायची असा प्रश्न आहे. जनावरांशिवाय शेतीची मशागत शक्य नाही. दुध व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍यांना प्रश्न पडला आहे. या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)