शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

ग्रामीण भागात पाण्यासह वैरणाचाही प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

खुबगाव : पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. पाण्याच्या समस्येसोबत जनावरांच्या वैरणाचा प्रश्नही अधिक गंभीर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या भयावह स्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या भागात सिंचन व्यवस्था नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील गावांना याचा फटका सहन करावा लागतो. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटू शकली नाही. भुजल पातळी चांगली असतानाही शासकीय यंत्रणेने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या भागात एकही प्रकल्प उभारल्या गेला नाही. त्यामुळे आज ही परिस्थती निर्माण झाली आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी प्रलंबित आहे.

प्रत्येक वर्षी थातूर-मातूर योजना राबविली जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र त्याचे फलित होत नाही. योजनेवर आजवर झालेला खर्च लक्षात पाहता या निधीतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना अंमलात येवू शकली असती. परंतु याकडे कुणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आजही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागते. या भागात पाण्याची मुबलकता आहे. पण पाणी नागरिकांपर्यंत पोहचविण्याची यंत्रणा नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागाची स्थिती दयनीय होत असून कमी अधिक पावसामुळे पिके, चारा यावर दुष्परिणाम झाला. शेतकरी, शेतमजूर कर्जबाजारी होऊन आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे कवडीमोल दराने जनावरे विक्री काढावी लागते. निसर्गही हुलकावनी देत असल्याने शेतकरी हतबल झाला. जनावरांकरिता चारा व पाणी नाही. शेतकर्‍यांना जनावरे कशी पाळायची असा प्रश्न आहे. जनावरांशिवाय शेतीची मशागत शक्य नाही. दुध व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍यांना प्रश्न पडला आहे. या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)