शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

रॉयल्टी दरवाढीविरूद्ध खाण, क्रशर बंद; गौण खनिज महागणार

By admin | Updated: November 26, 2015 02:13 IST

राज्य शासनाने ११ मे २०१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये केली आहे. पूर्वी ही रॉयल्टी प्रती ब्रास २०० रुपये होती.

अन्य राज्यात रॉयल्टी अल्प : १०० टक्के वाढ झाल्याने व्यवसाय मोडकळीसवर्धा : राज्य शासनाने ११ मे २०१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये केली आहे. पूर्वी ही रॉयल्टी प्रती ब्रास २०० रुपये होती. यामुळे खाण व क्रशर धारक तसेच सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील तसेच खाण उद्योगातील मजुरांवरही उपासमार व बेरोजगारीची वेळ आली आहे. याविरूद्ध गौण खनिज क्रशर धारकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. प्रारंभी जिल्ह्यापूरता मर्यादित असलेला बंद आता विदर्भात सर्वत्र पुकारला गेला आहे.साधारणात: रॉयल्टीवर दरवाढ करताना या उद्योगधंद्यातील एकंदरीत उत्पादन खर्च, शेजारील राज्याचे रॉयल्टीचे दर या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा असते; पण बांधकाम क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेणाऱ्या दगड, मुरूम, गिट्टीवर ४०० रुपये प्रती ब्रास रॉयल्टी लावली. यामुळे सामान्य जनतेचे घर बांधणचे स्वप्न भंगणार आहे. एवढेच नव्हे तर मुरूम, चुरीच्या किमतीपेक्षा रॉयल्टी दुपटीने वाढली आहे. मागील काळात दगड खाण क्षेत्रातील शिथील धोरणामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरले आहेत. कोट्यवधीचे कर्ज घेऊन उद्यो सुरू केला आहे. हजारो रोजगार या व्यवसायात काम करीत आहे. अशातच १०० टक्के रॉयल्टीची दरवाढ झाल्याने क्रशर धारकांवर कर्जबाजारी व बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.या प्रकरणी शेजारील अन्य राज्यांचे रॉयल्टीचे दर पाहिले तर मोठी तफावत दिसून येते. यात गुजरात राज्यात १०० रुपये प्रती ब्रास, मध्यप्रदेश १०० रुपये, राजस्थान १०० रुपये, आंध्रप्रदेश १३२ रुपये, छत्तीसगढ ८० रुपये प्रती ब्रास आहे. शेजारील राज्यातील रॉयल्टीचे दर १५० रुपये प्रती ब्रासच्या आत आहेत; पण महाराष्ट्रात आधीच २०० रुपये प्रती ब्रास असलेली रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये करण्यात आल्याने व्यवसायच कोलमडण्याची वेळ आली आहे. खान व्यवसायात काम करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महागाईमुळे क्रशर व्यवसायाला लागणारे सुट्या साहित्याच्या किमती, विजेचे बिल, विस्फोटक, कुशल, अकुशल मजुरांची मजुरी या सर्व बाबींमुळे हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. यातच १०० टक्के रॉयल्टी वाढीमुळे हा उद्योगच मोडकळीस आला आहे.रॉयल्टीवाढीचा हा निर्णय होताच राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खनिकर्ण मंत्री, खनिकर्म राज्यमंत्री, पालकमंत्री तसेच मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना लेखी निवेदने देत रॉयल्टी कमी करण्याची मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे खान व क्रशर उद्योजक संघाने बंद पुकारला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)