शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

प्रवाशांची ‘वाट बघतोय रिक्षावाला’...

By admin | Updated: May 2, 2015 00:08 IST

शहरात इतरत्र फिरण्यासाठी काही वर्षांपूर्वी नागरिक सायकल रिक्षाला प्राध्यान्य देत होते.

गतिमान युगात आॅटोला पसंती : शहरातील सायकलरिक्षा स्टँडवरही व्यावसायिकांचेच अतिक्रमण वर्धा: शहरात इतरत्र फिरण्यासाठी काही वर्षांपूर्वी नागरिक सायकल रिक्षाला प्राध्यान्य देत होते. आॅटोची संख्याही तितकीशी नव्हती; परंतु या काही वर्षांत आयुष्य गतिमान झाल्यामुळे सायकलरिक्षावरून प्रवास करणारे प्रवासी आॅटो व इतर खासगी वाहनांवर आले. त्यामुळे सायकलरिक्षा चालकांवर प्रवाश्याची वाट पाहण्याची वेळ आली आहे. सध्या एका चौकातून दुसऱ्या जाण्यासाठीही आॅटो वा दुचाकीचा वापर वाढला आहे. वर्धा शहरात देखील ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. प्रत्येकालाच कमीत कमी वेळात इतरत्र जावयाचे असते. आसपासच्या गावातील नागरिक नेहमीच वर्धा शहरात या ना त्या कामाने येत असतात. पूर्वी शहरात बस्थानकावरून आर्वी नाका, सेवाग्राम रेल्वेस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय कचेरी, जिल्हा परिषद आदी भागात नागरिकांना नेऊन देण्यासाठी सायकलरिक्षा ही महत्त्वाची भूमिका बजावत असे; परंतु हळूहळू इंधनावर चालत असलेले रिक्षा आणि वाहतुकीची इतरही साधनेही निर्माण झाली. वेळ वाचावा म्हणून नागरिक शहरात इतरत्र जाण्यासाठी आता आॅटोचा वापर करतात. नाईलाजेस्तोवच कधीकधीच नागरिक सायकलरिक्षाने जातात. त्यामुळे शहरातील बहुतेक सायकलरिक्षा हे मोडकळीस आले आहे. शहरात चौकाचौकात एखादा रिक्षावाला प्रवाश्यांची वाट पाहात असतात. परंतु दिवसदिवस एकही प्रवासी भेटत नसल्याची वेळही अनेकदा त्यांच्यावर येते. त्यामुळे एकेकाळी शहरांच्या प्रवासी व्यवस्थेचा कणा असलेल्या सायकलरिक्षा चालकांचाच कणा सध्या मोडला आहे. शहरात बोटावर मोजण्याइतके सायकलरिक्षा आजघडीला शिल्लक आहेत. त्यामुळे अनेकांचे रिक्षा हे मोडकळीस आले आहे. पर्याय नसल्याने अनेक रिक्षाचालक हा व्यवसाय करीत असले तरी गतिमान प्रवासी वाहनांच्या युगात आॅटोरिक्षाचालकांचे आयुष्य मात्र थांबले आहे.(शहर प्रतिनिधी) स्कूलरिक्षावाले काका झाले हद्दपारकाही वर्षांपूर्वी लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी सायकलरिक्षा वाले काका महत्त्वाची भूमिका बजावत असे. एक भावनिक नातेही यात असायचे. त्यामुळे चढ असताना मुले स्वत: उतरून धक्का मारायचे. पण आता सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलव्हॅनला पसंती दिली जात आहे. या कारणाने सायकलरिक्षांची मागणीही अचानक कमी झाली. याचाही विपरित परिणाम या व्यवसायावर झाला आहे. काही म्हातारे चालकच आज कसाबसा रिक्षा ओढताना दिसतात. शहरातील रिक्षास्टँडवर अतिक्रमणवाहतूक विभागाच्यावतीने शहरात बसस्थानकाच्या समोरासमोर रिक्षाचालकांसाठी जागा देण्यात आली आहे. त्यात रांगेने रिक्षा उभे असतात. परंतु रिक्षांची कमी होत जाणारी संख्या आणि पाहता येथे इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. दिवस दिवस बस्थानकावर एकही प्रवासी भेटर नसल्याने यातील बरेच रिक्षाचालक आपली रिक्षा ही स्थानकावर उभी न करता शहरात एखाद्या चौकात उभी करतात. प्रवासी नाही तर किमान एखादी वस्तू नेण्यासाठी तरी कुणी येईल या आशेवर ते असतात. सायकलरिक्षा बनले किरकोळ मालवाहूकधीकाळी प्रवासी वाहतुकीसाठी प्रसिद्ध असली सायकलरिक्षा सध्या किरकोळ माल वाहून नेण्याचे साधन बनले आहे. फ्रीज, कुलर, छोटी आलमारी अशी वाहने एखाद्याच्या घरी नेऊन देण्याचे काम सध्या रिक्षा करीत आहे. शहरात बोटावर मोजण्याइतके सायकलरिक्षा आज शिल्लक आहेत. त्यातील बरेच रिक्षा हे स्टँडवर थांबता दुकानांसमोर रिक्षा लावून उभे असतात. एखादी वस्तू घेतल्यावर आपली गरज पडेल अशी आशा त्यांना असते.