शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कारंजा तालुका निर्मल करण्याचा संकल्प

By admin | Updated: May 8, 2015 01:50 IST

गावच नव्हे तर संपूर्ण तालुका निर्मल करण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाने पुढकार घेवून प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

वर्धा : गावच नव्हे तर संपूर्ण तालुका निर्मल करण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाने पुढकार घेवून प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. त्यासोबतच संपूर्ण कारंजा तालुका निर्मल करण्याचा संकल्प गुरुवारी माहिती अभियान कार्यशाळेत सरपंच व उपसरपंचानी केला आहे.कारंजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे माहिती अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुरेंद्र भुयार आणि डी.बी. पाटील यांनी निर्मल ग्राम व ग्राम स्वच्छतेविषयीच्या विविध योजनांची माहिती दिली. केवळ दोन ते अडीच हजार कुटुंबांनी शौचालय न बांधल्यामुळे कारंजा विदर्भातील पहिला निर्मल तालुका होवू शकत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.करंजा पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पठारे, गोपाळ कालोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, सुरेंद्र भुयार, बालकल्याणचे एस.एम. मेसरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, उपवन संरक्षक मुकेश गाणात्रा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी भालेराव, जिल्हा परिषद सदस्य सारिका कौशिक, गजभिये, तेजराम बनकर, भलावी, प्रकाश मनवर, प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते.सभापती मानमोडे यांनी ग्रामविकासाच्या व वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक बदलासाठी प्रत्येक विभागाची योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविकात माहिती अभियान योजना संदर्भात माहिती दिली.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजना सांगताना पी.बी. पाटील यांनी कारंजा तालुक्यात दोन हजार शौचालय बांधण्याचा कार्यक्रम तसेच प्रत्येक गावात स्वच्छ पाणी व मिटरने पाणी देण्याची भूमिका विषद केली. उपवन संरक्षक मुकेश गाणात्रा यांनी वन्यप्राण्याच्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना मदत वनभागामुळे प्रलंबित विकास प्रकल्प सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची हमी दिली. वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याचे नियोजन करताना यापुढे सरपंच व ग्रामसेवकांनी मोफत पाणी न देण्याची भूमिका घ्यावी, तसेच प्रत्येक नळाला मिटर लावून पाणीपट्टी भरण्याबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करावी, अशी सूचना केली.सहायक प्रकल्प अधिकारी भालेराव यांनी बचतगट व प्रधानमंत्री जनधन योजनेची माहिती दिली. संचालन करीत उपस्थितांचे आभार विनीश काकडे यांनी मानले. यावेळी गटविकास अधिकारी पी.डी. कडबे, विस्तार अधिकारी मालधारी, पंचायत विस्तार अधिकारी घोडे, नायब तहसीलदार गी.बी. बर्वे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)