शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

समान नागरी कायद्याचा विरोध

By admin | Updated: December 29, 2016 00:44 IST

केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पत्रपरिषदेत माहिती : शुक्रवारी ईदगाह मैदानातून मुस्लिमांचा मूकमोर्चा वर्धा : केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून मुस्लीम समाजाच्या कायद्यावर गदा येणार आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. शरीयतमध्ये कायद्याचा हस्तक्षेप नकोच, अशी भूमिका मुस्लीम समाजाने घेतली आहे. याविरूद्ध वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो लागू होऊ नये म्हणून मुस्लीम समाज एकवटला आहे. हा कायदा लागू झाल्यास शरीयतमध्ये हस्तक्षेप होईल आणि तो कदापिही मान्य नाही. या कायद्याचा विरोध करण्याकरिता वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शहरात शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हा पहिला मोर्चा असल्याने केवळ पुरूष मंडळी सहभागी होणार आहे. मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार मुस्लीम बांधव सहभागी होतील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी सर्व मुस्लीम बांधव स्पयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात येणार आहे. मूकमोर्चा शुक्रवारी दुपारी ३ वाजता महात्मा गांधी ग्राऊंड (ईदगाह मैदान) येथून निघणार आहे. बजाज चौक, बडे चौक, सीमा मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मूकमोर्चामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा शिरकाव नसल्याचे मूकमोर्चा समितीचे अध्यक्ष जुबेर शेख यांनी स्पष्ट केले. इस्लाम व शरीयतच्या संरक्षणाकरिता मुस्लीम समाज आंदोलन करीत आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अर्शी मलिक, अता उल्लाह पठाण, हाजी सोहराब तुरक, शेख अफसर, शेख सलीम, शेख नईम, बबलू शफी, शेख राजा, वसीम अली, शेख नवाब, मो. मुर्तूजा मंसुरी, हासीफ कुरेशी, शेख इमू, हाजी तौफीक नुराणी, हाजी अलताफ भाई, अकरम शेख, शेख जमील, शेख सादीक, शेख मुश्ताक कुरेशी, कलाम अंसारी, सैयद इरशाद यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)