शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
4
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
5
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
6
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
7
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
8
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
9
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
10
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
11
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
12
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
13
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
14
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
15
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
16
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
17
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
18
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
19
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
20
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश

समान नागरी कायद्याचा विरोध

By admin | Updated: December 29, 2016 00:44 IST

केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पत्रपरिषदेत माहिती : शुक्रवारी ईदगाह मैदानातून मुस्लिमांचा मूकमोर्चा वर्धा : केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून मुस्लीम समाजाच्या कायद्यावर गदा येणार आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. शरीयतमध्ये कायद्याचा हस्तक्षेप नकोच, अशी भूमिका मुस्लीम समाजाने घेतली आहे. याविरूद्ध वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो लागू होऊ नये म्हणून मुस्लीम समाज एकवटला आहे. हा कायदा लागू झाल्यास शरीयतमध्ये हस्तक्षेप होईल आणि तो कदापिही मान्य नाही. या कायद्याचा विरोध करण्याकरिता वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शहरात शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हा पहिला मोर्चा असल्याने केवळ पुरूष मंडळी सहभागी होणार आहे. मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार मुस्लीम बांधव सहभागी होतील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी सर्व मुस्लीम बांधव स्पयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात येणार आहे. मूकमोर्चा शुक्रवारी दुपारी ३ वाजता महात्मा गांधी ग्राऊंड (ईदगाह मैदान) येथून निघणार आहे. बजाज चौक, बडे चौक, सीमा मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मूकमोर्चामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा शिरकाव नसल्याचे मूकमोर्चा समितीचे अध्यक्ष जुबेर शेख यांनी स्पष्ट केले. इस्लाम व शरीयतच्या संरक्षणाकरिता मुस्लीम समाज आंदोलन करीत आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अर्शी मलिक, अता उल्लाह पठाण, हाजी सोहराब तुरक, शेख अफसर, शेख सलीम, शेख नईम, बबलू शफी, शेख राजा, वसीम अली, शेख नवाब, मो. मुर्तूजा मंसुरी, हासीफ कुरेशी, शेख इमू, हाजी तौफीक नुराणी, हाजी अलताफ भाई, अकरम शेख, शेख जमील, शेख सादीक, शेख मुश्ताक कुरेशी, कलाम अंसारी, सैयद इरशाद यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)