शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नलिका सिंचन वितरण पद्धत मान्यतेनंतरही दुर्लक्षितच

By admin | Updated: December 29, 2016 00:48 IST

पाणी रोखण्यासाठी प्रकल्पांची निर्मिती करण्यात येते तर त्या पाण्याच्या वितरणासाठी कालवे, पाटचऱ्या, मायनरची निर्मिती केली जाते.

अंमलबजावणीची मागणी : शेतकरी हितासाठी योजनेची गरज वर्धा : पाणी रोखण्यासाठी प्रकल्पांची निर्मिती करण्यात येते तर त्या पाण्याच्या वितरणासाठी कालवे, पाटचऱ्या, मायनरची निर्मिती केली जाते. यात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागतात. हे करीत असताना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शिवाय जमिनीचा मोबदला, बाधितांचे पुनर्वसन यासाठी मोठा कालावधी लागतो. हा प्रकार टाळण्यासाठी नलिका सिंचन वितरण पद्धत उपयुक्त ठरते. या पद्धतीला संबंधित मंत्रीमंडळाने मान्यताही प्रदान केली; पण तिच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ही पद्धत जिल्ह्यात अवलंबावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा वापर कार्यक्षमतेने करून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह कालव्यांसाठी जमीन अधिग्रहणाची समस्या सोडविण्यासाठी पारंपरिक वितरण प्रणालीमध्ये बदल करण्याची गरज होती. त्यानुसार तयार केलेल्या नलिका वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेगाने पूर्ण करणे, राज्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे व पाण्याचा अनिर्बंध वापर कमी करण्यासाठी सूक्ष्म सिंचन वाढविणे आदी बाबी गरजेच्या होत्या. केवळ प्रशासकीय मान्यता प्राप्त प्रकल्प अहवालात पारंपरिक वितरण प्रणालीची तरतूद होती. यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेशिवाय नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करता येत नव्हता. त्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या या पद्धतीबाबत स्वतंत्र धोरणाच्या मसुद्यास मान्यता मिळाली. असे असले तरी अद्याप या पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचेच दिसून येत आहे. केंद्र शासनाने पाणी वापराच्या कार्यक्षमतेत २०१७ पर्यंत २० टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय कमी करणे, भूसंपादन क्षेत्र कमी करणे यासाठी नलिका वितरणास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्यातील २६ प्रकल्प समाविष्ट असून त्यांची अंमलबजावणी करताना सुक्ष्म सिंचनास प्राधान्य देण्याच्या सूचना आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार २०१९ पासून बारमाही पिकांना सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी विभागाद्वारे राज्यात ५ वर्षांत दरवर्षी सरासरी १.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर सुक्ष्म सिंचनासाठी अनुदान दिले जाते; पण केवळ धोरणाअभावी शासकीय प्रकल्पावर ही पद्धत राबविता येत नव्हती. लघुवितरिका व पाटचाऱ्यांसाठी नलिका वापरल्यास २५ टक्के पाणी बचत होते. नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे शक्य आहे. या पद्धतीसाठी भूसंपादनाची गरज नाही. शेतकऱ्यांना मशागत करण्यास अडथळा निर्माण होत नाही. नलिका वितरण पद्धतीची देखभाल, दुरुस्ती व परिचलन खर्च कमी आहे. वाढते नागरी व औद्योगिकीकरणामुळे बिगर सिंचन पाणी वापरात वाढ होत आहे. यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात घट झाली. ही घट वाढतच जाणार आहे. हे वास्तव लक्षात घेऊन सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करून अधिकाधिक जमीन सिंचनयुक्त करणे गरजेचे झाले आहे. नलिका वितरण पद्धतीने होणाऱ्या पाण्याच्या बचतीचा लाभक्षेत्रातील लागवडीयोग्य व नियोजित सिंचनक्षेत्र यातील तफावत दूर करण्यास होणार आहे. यामुळे ही पद्धत अवलंबावी, अशी मागणी बोथुडा येथील रोशन रामदास कावळे व शेतकऱ्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)