शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण

By admin | Updated: June 26, 2016 02:01 IST

आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती

व्हीजेएमचा उपक्रम : ३०० वृक्षांचे होणार रोपणवर्धा : आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती घेतलेल्या प्रकल्पाला मूर्त रूप येत आहे. ही चळवळ आता केवळ व्हीजेएमची राहिली नसून त्यात जनसहभागही मिळू लागला आहे. नागरिक यथाशक्ती मदत करीत असल्याने हनुमान टेकडीवर व्हीजेएम व नागरिकांच्या प्रयत्नाने तब्बल एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. राज्यात काही भागात जाणवलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आणि खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता पुनर्भरण हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. टंचाईग्रस्त भागात शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जात आहेतच; पण आपल्याही जिल्ह्यात भविष्यातील टंचाईची शक्यता ओळखून कुणीतरी समोर येणे गरजेचे होते. हा पुढाकार वैद्यकीय जनजागृती मंचाने घेतला. प्रारंभी एक-दोन करीत तब्बल ५० ते ६० नागरिकांच्या श्रमदानातून हनुमान टेकडी पिपरी (मेघे) येथे पुनर्भरण प्रकल्पाने मूर्त रूप घेतले. व्हीजेएम व नागरिकांच्या मदतीने टेकडीवर ८ बाय २ बाय २ या आकाराचे तब्बल १५० खंदक करण्यात आले आहेत. टेकडीवरील पावसाचे पाणी वाहून येत या खड्ड्यांमध्ये जिरणार आहे. पावसाचे पाणी आणि माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक खंदकाच्या माथ्यावरील भागात वृक्षांची लागवड केली जात आहे. या टेकडीवर सुमारे ३०० वृक्षांचे रोपण करण्याचा मानस व्हीजेएमद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. खंदक आणि वृक्षांच्या माध्यमातून या टेकडीवर पावसाळ्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत शहरातील एक टेकडी भूजल पातळीत वाढ करणारी तसेच वातावरण रमनिय करणारी ठरणार आहे.खंदकांचे काम श्रमदानातून पूर्ण करण्यात आल्यानंतर आता टेकडीच्या सभोवताल कुंपण करण्यात येणार आहे. या परिसरात गुरांमुळे झाडांना धोका होऊ नये, उपद्रवींचा त्रास होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली जाणार आहे. यासाठी ही चळवळ नागरिकांची होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून लोकसहभागासाठी रविवारी कार्यशाळाही घेण्यात येत आहे. या लोकोपयोगी चळवळीमध्ये किती नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उपक्रम समाजाचा होणे अपेक्षितवर्धा शहरातील नागरिक सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात, हा अनुभव आहे. याच अनुभवातून वैद्यकीय जनजागृती मंचाच्या लोकोपयोगी उपक्रमालाही नागरिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हीजेएमचा हा उपक्रम समाजाचा झाल्यास भूजल पातळीत वाढ करण्याच्या संकल्पाला मूर्त रूप येऊ शकते. शिवाय वर्धा शहराला भविष्यात भासणारी पाण्याची टंचाई कित्येक वर्षांसाठी दूर करता येणार आहे. यामुळे नागरिकांनी आपलेच हित लक्षात घेऊन हा उपक्रम आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.रविवारी बैठक व कार्यशाळावैद्यकीय जनजागृती मंचाने प्रथम हाती घेतलेली पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणारी योजना आता जनतेची झाली आहे. खंदक करण्याचे काम श्रमदानातून आटोपण्यात आले आहे; पण वृक्षारोपण, टेकडीला कुंपण करणे आदी कामे व्हायची आहेत. यात कुंपणासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा राहणार आहे. यासाठी वैद्यकीय जनजागृती मंच प्रयत्न करीत असून रविवारी सकाळी ७.३० वाजता बैठक व कार्यशाळा आयोजित आहे. यात डॉ. सचिन पावडे मार्गदर्शन करतील. नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळाला तर एक चांगली योजना कार्यान्वित होणार आहे.३०० वृक्षांचे रोपणहनुमान टेकडीवर खंदकांच्या बाजूला माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात ३०० वृक्ष लावण्याचा मानस असून रविवारपासून दररोज ५० रोपट्यांचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाकडून देण्यात आली.