शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण

By admin | Updated: June 26, 2016 02:01 IST

आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती

व्हीजेएमचा उपक्रम : ३०० वृक्षांचे होणार रोपणवर्धा : आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती घेतलेल्या प्रकल्पाला मूर्त रूप येत आहे. ही चळवळ आता केवळ व्हीजेएमची राहिली नसून त्यात जनसहभागही मिळू लागला आहे. नागरिक यथाशक्ती मदत करीत असल्याने हनुमान टेकडीवर व्हीजेएम व नागरिकांच्या प्रयत्नाने तब्बल एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. राज्यात काही भागात जाणवलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आणि खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता पुनर्भरण हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. टंचाईग्रस्त भागात शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जात आहेतच; पण आपल्याही जिल्ह्यात भविष्यातील टंचाईची शक्यता ओळखून कुणीतरी समोर येणे गरजेचे होते. हा पुढाकार वैद्यकीय जनजागृती मंचाने घेतला. प्रारंभी एक-दोन करीत तब्बल ५० ते ६० नागरिकांच्या श्रमदानातून हनुमान टेकडी पिपरी (मेघे) येथे पुनर्भरण प्रकल्पाने मूर्त रूप घेतले. व्हीजेएम व नागरिकांच्या मदतीने टेकडीवर ८ बाय २ बाय २ या आकाराचे तब्बल १५० खंदक करण्यात आले आहेत. टेकडीवरील पावसाचे पाणी वाहून येत या खड्ड्यांमध्ये जिरणार आहे. पावसाचे पाणी आणि माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक खंदकाच्या माथ्यावरील भागात वृक्षांची लागवड केली जात आहे. या टेकडीवर सुमारे ३०० वृक्षांचे रोपण करण्याचा मानस व्हीजेएमद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. खंदक आणि वृक्षांच्या माध्यमातून या टेकडीवर पावसाळ्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत शहरातील एक टेकडी भूजल पातळीत वाढ करणारी तसेच वातावरण रमनिय करणारी ठरणार आहे.खंदकांचे काम श्रमदानातून पूर्ण करण्यात आल्यानंतर आता टेकडीच्या सभोवताल कुंपण करण्यात येणार आहे. या परिसरात गुरांमुळे झाडांना धोका होऊ नये, उपद्रवींचा त्रास होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली जाणार आहे. यासाठी ही चळवळ नागरिकांची होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून लोकसहभागासाठी रविवारी कार्यशाळाही घेण्यात येत आहे. या लोकोपयोगी चळवळीमध्ये किती नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उपक्रम समाजाचा होणे अपेक्षितवर्धा शहरातील नागरिक सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात, हा अनुभव आहे. याच अनुभवातून वैद्यकीय जनजागृती मंचाच्या लोकोपयोगी उपक्रमालाही नागरिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हीजेएमचा हा उपक्रम समाजाचा झाल्यास भूजल पातळीत वाढ करण्याच्या संकल्पाला मूर्त रूप येऊ शकते. शिवाय वर्धा शहराला भविष्यात भासणारी पाण्याची टंचाई कित्येक वर्षांसाठी दूर करता येणार आहे. यामुळे नागरिकांनी आपलेच हित लक्षात घेऊन हा उपक्रम आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.रविवारी बैठक व कार्यशाळावैद्यकीय जनजागृती मंचाने प्रथम हाती घेतलेली पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणारी योजना आता जनतेची झाली आहे. खंदक करण्याचे काम श्रमदानातून आटोपण्यात आले आहे; पण वृक्षारोपण, टेकडीला कुंपण करणे आदी कामे व्हायची आहेत. यात कुंपणासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा राहणार आहे. यासाठी वैद्यकीय जनजागृती मंच प्रयत्न करीत असून रविवारी सकाळी ७.३० वाजता बैठक व कार्यशाळा आयोजित आहे. यात डॉ. सचिन पावडे मार्गदर्शन करतील. नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळाला तर एक चांगली योजना कार्यान्वित होणार आहे.३०० वृक्षांचे रोपणहनुमान टेकडीवर खंदकांच्या बाजूला माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात ३०० वृक्ष लावण्याचा मानस असून रविवारपासून दररोज ५० रोपट्यांचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाकडून देण्यात आली.