शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण

By admin | Updated: June 26, 2016 02:01 IST

आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती

व्हीजेएमचा उपक्रम : ३०० वृक्षांचे होणार रोपणवर्धा : आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती घेतलेल्या प्रकल्पाला मूर्त रूप येत आहे. ही चळवळ आता केवळ व्हीजेएमची राहिली नसून त्यात जनसहभागही मिळू लागला आहे. नागरिक यथाशक्ती मदत करीत असल्याने हनुमान टेकडीवर व्हीजेएम व नागरिकांच्या प्रयत्नाने तब्बल एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. राज्यात काही भागात जाणवलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आणि खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता पुनर्भरण हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. टंचाईग्रस्त भागात शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जात आहेतच; पण आपल्याही जिल्ह्यात भविष्यातील टंचाईची शक्यता ओळखून कुणीतरी समोर येणे गरजेचे होते. हा पुढाकार वैद्यकीय जनजागृती मंचाने घेतला. प्रारंभी एक-दोन करीत तब्बल ५० ते ६० नागरिकांच्या श्रमदानातून हनुमान टेकडी पिपरी (मेघे) येथे पुनर्भरण प्रकल्पाने मूर्त रूप घेतले. व्हीजेएम व नागरिकांच्या मदतीने टेकडीवर ८ बाय २ बाय २ या आकाराचे तब्बल १५० खंदक करण्यात आले आहेत. टेकडीवरील पावसाचे पाणी वाहून येत या खड्ड्यांमध्ये जिरणार आहे. पावसाचे पाणी आणि माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक खंदकाच्या माथ्यावरील भागात वृक्षांची लागवड केली जात आहे. या टेकडीवर सुमारे ३०० वृक्षांचे रोपण करण्याचा मानस व्हीजेएमद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. खंदक आणि वृक्षांच्या माध्यमातून या टेकडीवर पावसाळ्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत शहरातील एक टेकडी भूजल पातळीत वाढ करणारी तसेच वातावरण रमनिय करणारी ठरणार आहे.खंदकांचे काम श्रमदानातून पूर्ण करण्यात आल्यानंतर आता टेकडीच्या सभोवताल कुंपण करण्यात येणार आहे. या परिसरात गुरांमुळे झाडांना धोका होऊ नये, उपद्रवींचा त्रास होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली जाणार आहे. यासाठी ही चळवळ नागरिकांची होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून लोकसहभागासाठी रविवारी कार्यशाळाही घेण्यात येत आहे. या लोकोपयोगी चळवळीमध्ये किती नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उपक्रम समाजाचा होणे अपेक्षितवर्धा शहरातील नागरिक सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात, हा अनुभव आहे. याच अनुभवातून वैद्यकीय जनजागृती मंचाच्या लोकोपयोगी उपक्रमालाही नागरिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हीजेएमचा हा उपक्रम समाजाचा झाल्यास भूजल पातळीत वाढ करण्याच्या संकल्पाला मूर्त रूप येऊ शकते. शिवाय वर्धा शहराला भविष्यात भासणारी पाण्याची टंचाई कित्येक वर्षांसाठी दूर करता येणार आहे. यामुळे नागरिकांनी आपलेच हित लक्षात घेऊन हा उपक्रम आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.रविवारी बैठक व कार्यशाळावैद्यकीय जनजागृती मंचाने प्रथम हाती घेतलेली पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणारी योजना आता जनतेची झाली आहे. खंदक करण्याचे काम श्रमदानातून आटोपण्यात आले आहे; पण वृक्षारोपण, टेकडीला कुंपण करणे आदी कामे व्हायची आहेत. यात कुंपणासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा राहणार आहे. यासाठी वैद्यकीय जनजागृती मंच प्रयत्न करीत असून रविवारी सकाळी ७.३० वाजता बैठक व कार्यशाळा आयोजित आहे. यात डॉ. सचिन पावडे मार्गदर्शन करतील. नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळाला तर एक चांगली योजना कार्यान्वित होणार आहे.३०० वृक्षांचे रोपणहनुमान टेकडीवर खंदकांच्या बाजूला माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात ३०० वृक्ष लावण्याचा मानस असून रविवारपासून दररोज ५० रोपट्यांचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाकडून देण्यात आली.