शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

घन ओथंबून येती़़ग़ाण्यातील पाऊसही बेपत्ताच

By admin | Updated: July 10, 2014 23:45 IST

‘घन आथंबून येती, बनात राघू ओजिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती, घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती, डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती़़़’ हे गाणे एकेकाळी प्रसिद्ध होते़

विजयगोपाल : ‘घन आथंबून येती, बनात राघू ओजिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती, घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती, डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती़़़’ हे गाणे एकेकाळी प्रसिद्ध होते़ या कवितेतील पाऊस यावर्षी प्रत्यक्षात बरसलाच नाही़ यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग अधिकच गडद होताना दिसून येत आहे़ एन महिन्यात रोहिणीनंतर मृग कोरडा गेला़ आर्द्राकडून अपेक्षा असताना या नक्षत्राने निराशाच केली. जून संपून जुलै महिना सुरू झाला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. कालपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून सर्वांच्या नजरा आकाशावर भिडल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येतील, अशीच सर्वांना पावसाची हूरहूर लागली आहे़ पावसाच्या दडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचेच दिसून येत आहे़ पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली तर जुलै महिन्यात ६ जुलैपासून पुनर्वस् नक्षत्र सुरू झाले असून या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात केवळ ढग दाटून येत आहेत; पण पावसाची एक सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे ‘गंदर्भ’ हे वाहन असून गंदर्भ जिकडे जाते तिकडेच चालले जाते, म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील, अशीच काहीशी स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीने जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील विजयगोपाल, इंझाळा, तांभा (येंडे), सावंगी (येंडे), हिवरा (कावरे), मलातपूर, रोहणी (वसू) चोंढी यासह इतर गावांतील काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे़ त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धूळपेरणी वाया गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे महाग बियाणे मातीत गेले आहे. अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य स्थितीमुळे नदी-नाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरून वाहत असतात; पण निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदी-नाले व इतर जलस्त्रोत कोरडे ठण्ण पडले आहेत़ काही नदी नाल्यांत थोड्या प्रमाणात जलसाठा असून त्यातही शेवाळ व कचरा घाण साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे़ प्रदूषण वाढले आहे. पाऊस नसल्याने नदी-नाले व अन्य जलस्त्रोत अस्वच्छ झालेत़ पावसाच्या हुलकावणीमुळे सर्वांचीच चिंता वाढत असल्याचे दिसते़(वार्ताहर)