शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात खरिपाची १७ टक्केच पेरणी : निकृष्ट बियाणे उठले जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाला होता. परंतु, शेतकऱ्यांमागील संकटांचे दुष्टचक्र थांबता-थाबेना. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना शासनाने कुठलीही आर्थिक मदत केली नाही.बँकेने पीक कर्जासाठी टाळले म्हणून शेतकऱ्यांनी हातउसने कर्ज घेऊन काळ्या आईची ओटी भरली.जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७६ हजार ६५४.७५ हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपासीसह इतर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यात सरसरी १७.३१ टक्के खरीपाच्या पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात तूर १०० हेक्टर, सोयाबीन १६० तर कापूस १३ हजार ६००, आर्वी तालुक्यात सोयाबीनची ८२७, तूर २१०, कापूस १५२० आष्टी तालुक्यात तूर ६३९, सोयाबीन १७४२, कापूस ३४६४, कारंजा तालुक्यात तूर ४६८.१, सोयाबीन ११५९.५, कापूस १८७८.१५, सेलू तालुक्यात तूर ३२१९, सोयाबीन ११ हजार ७५३, कापूस १९ हजार ६०२, देवळी तालुक्यात तूर ७३०, सोयाबीन १९०० तर कापसाची ११९७ हेक्टरवर, हिंगणघाट तालुक्यात तूर पिकाची ९७४, सोयाबीन ७११, कापूस ८०५४ तसेच समुद्रपूर तालुक्यात तूरीची २४९, सोयाबीनची ४५५ तर कापूस पिकाची १७९० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काही भागातील पेरण्या अद्यापपर्यंत थांबलेल्या आहेत. यंदा विविध नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली आहे. पेरणी होऊन बराच कालावधी लोटलेला आहे. मात्र, आठवडाभरात साधे कोंबही फुटले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सरकारी दरबारी दाखल झाल्या नसल्या तरी गावोगावी सोयाबीन उगवले अथवा नाही, कृषी केंसद्र चालकांकडून बनावट बियाणे दिले जात आहे काय? याची चर्चा शेतकरी करीत आहेत.लॉकडाऊनकाळात बोगस बियाणे आले कोठून?कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच शेतकऱ्यांपर्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे पोहचले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. सरकार बांधावर खते व बियाणे पोहोचवू शकले नाही. मात्र, बोगस बियाणेही रोखू शकले नाही. त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीलाच नागवला गेला आहे. याला जबाबदार कोण? लॉकडाऊनमध्ये बोगस बियाणे आले कुठून? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची चौकशी करून संबधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.पंचनामे होणार, पण नुकसानभरपाई मिळणार काय?सध्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करुन पेरणी केली. परंतु, आठ दिवसांनंतरही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांना खरच नुकसान भरपाई मिळणार काय, हा प्रश्न आहे. कारण मागील दोन वषार्पासून ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्र देवून, पंचनामे होवूनही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आताही अशीच अवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.