शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात खरिपाची १७ टक्केच पेरणी : निकृष्ट बियाणे उठले जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाला होता. परंतु, शेतकऱ्यांमागील संकटांचे दुष्टचक्र थांबता-थाबेना. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना शासनाने कुठलीही आर्थिक मदत केली नाही.बँकेने पीक कर्जासाठी टाळले म्हणून शेतकऱ्यांनी हातउसने कर्ज घेऊन काळ्या आईची ओटी भरली.जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७६ हजार ६५४.७५ हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपासीसह इतर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यात सरसरी १७.३१ टक्के खरीपाच्या पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात तूर १०० हेक्टर, सोयाबीन १६० तर कापूस १३ हजार ६००, आर्वी तालुक्यात सोयाबीनची ८२७, तूर २१०, कापूस १५२० आष्टी तालुक्यात तूर ६३९, सोयाबीन १७४२, कापूस ३४६४, कारंजा तालुक्यात तूर ४६८.१, सोयाबीन ११५९.५, कापूस १८७८.१५, सेलू तालुक्यात तूर ३२१९, सोयाबीन ११ हजार ७५३, कापूस १९ हजार ६०२, देवळी तालुक्यात तूर ७३०, सोयाबीन १९०० तर कापसाची ११९७ हेक्टरवर, हिंगणघाट तालुक्यात तूर पिकाची ९७४, सोयाबीन ७११, कापूस ८०५४ तसेच समुद्रपूर तालुक्यात तूरीची २४९, सोयाबीनची ४५५ तर कापूस पिकाची १७९० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काही भागातील पेरण्या अद्यापपर्यंत थांबलेल्या आहेत. यंदा विविध नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली आहे. पेरणी होऊन बराच कालावधी लोटलेला आहे. मात्र, आठवडाभरात साधे कोंबही फुटले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सरकारी दरबारी दाखल झाल्या नसल्या तरी गावोगावी सोयाबीन उगवले अथवा नाही, कृषी केंसद्र चालकांकडून बनावट बियाणे दिले जात आहे काय? याची चर्चा शेतकरी करीत आहेत.लॉकडाऊनकाळात बोगस बियाणे आले कोठून?कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच शेतकऱ्यांपर्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे पोहचले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. सरकार बांधावर खते व बियाणे पोहोचवू शकले नाही. मात्र, बोगस बियाणेही रोखू शकले नाही. त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीलाच नागवला गेला आहे. याला जबाबदार कोण? लॉकडाऊनमध्ये बोगस बियाणे आले कुठून? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची चौकशी करून संबधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.पंचनामे होणार, पण नुकसानभरपाई मिळणार काय?सध्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करुन पेरणी केली. परंतु, आठ दिवसांनंतरही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांना खरच नुकसान भरपाई मिळणार काय, हा प्रश्न आहे. कारण मागील दोन वषार्पासून ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्र देवून, पंचनामे होवूनही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आताही अशीच अवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.