शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

पावसाचा कहर; पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: March 2, 2015 00:16 IST

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली...

वर्धा : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली असून गहू, चणा, तूर पिकांची धुळधाण झाली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तूर अद्याप काढली नव्हती़ पेट्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या; पण कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे त्या पेट्या शेतातच सडण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिवाय वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील छतही कोसळले़ तब्बल १२ तासांपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व ग्रामीण नागरिकांचे मोठेच नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तास संततधारतळेगाव (श्या.पं.) - शनिवारी दुपारी ४ वाजतपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली़ कमी-अधिक १२ तास पाऊस झाल्याने शेतात लावलेल्या तुरीच्या वचन्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गव्हाचे उभे असलेले पीक शेतामध्ये जमिनीवर लोळले़ मृगबहाराची संत्री गळाली. शेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. या परिसरातील गहू पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. हरभरा सवंगणीवर आला असताना अचानक हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे हरभरा पूर्णत: भिजला आहे. पावसामुळे शेतात सवंगलेली तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका सुरूचकापसाला भाव नाही तर दोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ सर्वाधिक नुकसान गहू आणि संत्रा पिकाचे झाले आहे़ परिसरात सर्वत्र ऊंबईवर आलेला गहू शेतातच झोपला आहे़ यापूर्वीच्या वादळाने गव्हाचे दाने बारिक झाले होते़ रविवार सकाळपासून पाऊस सुरू असल्याने पावसाळ्याची झड असल्यागत दृश्य आहे़