शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

पावसाचा कहर; पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: March 2, 2015 00:16 IST

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली...

वर्धा : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली असून गहू, चणा, तूर पिकांची धुळधाण झाली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तूर अद्याप काढली नव्हती़ पेट्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या; पण कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे त्या पेट्या शेतातच सडण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिवाय वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील छतही कोसळले़ तब्बल १२ तासांपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व ग्रामीण नागरिकांचे मोठेच नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तास संततधारतळेगाव (श्या.पं.) - शनिवारी दुपारी ४ वाजतपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली़ कमी-अधिक १२ तास पाऊस झाल्याने शेतात लावलेल्या तुरीच्या वचन्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गव्हाचे उभे असलेले पीक शेतामध्ये जमिनीवर लोळले़ मृगबहाराची संत्री गळाली. शेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. या परिसरातील गहू पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. हरभरा सवंगणीवर आला असताना अचानक हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे हरभरा पूर्णत: भिजला आहे. पावसामुळे शेतात सवंगलेली तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका सुरूचकापसाला भाव नाही तर दोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ सर्वाधिक नुकसान गहू आणि संत्रा पिकाचे झाले आहे़ परिसरात सर्वत्र ऊंबईवर आलेला गहू शेतातच झोपला आहे़ यापूर्वीच्या वादळाने गव्हाचे दाने बारिक झाले होते़ रविवार सकाळपासून पाऊस सुरू असल्याने पावसाळ्याची झड असल्यागत दृश्य आहे़