शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:32 IST

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट : फुलेही गळाली; कपाशीलाही फुले, पात्या नाही, जलसाठ्यात ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही. परिणामी, सोयाबीनचे उत्पन्न गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिवाय कपाशीचीही तिच अवस्था आहे. पाऊस नसल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. यामुळे कपाशीलाही फुले-पात्या येत नसल्याने त्याच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे.आतापर्यंत आलेल्या पावसामुळे पिके हिरवी दिसत होती; पण जलसाठ्यात पाण्याचा थेंब नव्हता. पावसाअभावी जलसाठेही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे रबी हंगामही आताच धोक्यात आला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस येईल, असे चित्र निर्माण होते; पण काही काळातच आकाश पुन्हा निरभ्र होऊन उन्ह तापते. यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे.यंदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्वत्र भक्कम पाऊस पडेल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या परिस्थितीतही जिल्ह्यात दीड लाख हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा झाला आहे तर अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात आज-उद्या पाऊस येईल, असे वाटत असताना आता पावसाची आशाही मावळली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरड्या दु्ष्काळाची चिन्हे आहेत.पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकºयांचा सण पोळा तोंडावर आला आहे. याच काळात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे पोळ्याचा सण कसा करावा, असा विचार शेतकरी करीत आहेत. शेतात पिकांनी टाकलेल्या माना आणि गाठीला नसलेला पैसा, यामुळे शेतकºयांची चांगलीच वाताहत झाल्याचे चित्र आहे. यातच कर्जमाफीचाही आधार मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी जोर धरत आहे.