शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरूच

By admin | Updated: May 27, 2014 23:55 IST

रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत.

वर्धा : रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांद्वारे प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात असून ४00 रुपयांच्या एका तिकीटासाठी प्रवाशांना ६00 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तत्काल तिकीटांमध्येही काळाबाजार होत असल्याने प्रवाशांना तिकिटाच मिळत नसल्याचेच दिसते.

उन्हाळ्याच्या सुट्या संपत आल्या असून लग्नसराईदेखील आटोपत आहे. यामुळे नागरिकांची आपापल्या गावांकडे परतण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये रेल्वे, एसटी फुल्ल राहत असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात; पण या दोन्ही सिझनमध्ये ट्रॅव्हल्स धारकांद्वारे प्रवासी तिकीटात मोठी भाववाढ केली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. सध्या नागरिकांची आपापल्या गावी परतण्याची लगबग सुरू झाल्याने रेल्वेच्या तिकीटासाठी सक्रीय असलेल्या दलालांची लॉटरीच लागली आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना एका तिकीटमागे १00 ते ३00 रुपये आगाऊ मोजावे लागत आहेत. रेल्वेचे आरक्षित तिकीट आधीच काढून ठेवायचे असेल व त्यात कन्फर्म तिकीटाची हमी द्यायची नसेल तर दलाल प्रत्येक तिकीटावर १00 ते २00 रुपये आगाऊ आकारतात. यातील रेल्वेच्या तात्काळ आरक्षित तिकीटांसाठी कन्फर्म सिटसाठी २00 ते ४00 रुपये आगाऊ आकारले जात आहेत. यामुळे प्रवाशांना ४00 रुपयांचे तिकीट असेल तर ते तिकीट ६00 ते ८00 रुपयांमध्ये खरेदी करावे लागत आहे.

पुलगाव ते हावडा कोलकाता या प्रवासाचे साधे आरक्षित तिकीट ४८0 रुपयांचे होते. यात तात्काळ तिकीट काढल्यास सुमारे १५0 रुपये रेल्वेला अधिकचे द्यावे लागतात. याच तिकीटा दलालांकडून घेतल्यास ६३0 रुपये प्रती तिकीटाऐवजी २00 रुपये आगाऊ खर्च करून म्हणजे ८३0 ते ९00 रुपयांमध्ये घ्याव्या लागतात. यात तात्काळ आरक्षणाच्या शुल्कासह दलालाचे २00 ते ३00 रुपये अधिक मोजावे लागत असल्याने प्रवाशांचे कंबरडेच मोडले जात आहे. असाच प्रकार मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई, नवी दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणच्या तिकीटांबाबत घडत आहे. ४00 रुपयांच्या तिकीटासाठी ६00 रुपये द्यावे लागत असल्याने एका कुटुंबात जर ६ सदस्य असतील तर केवळ प्रवासासाठी त्यांना ३ हजार ६00 रुपये मोजावे लागतात. यात दलाल १२00 रुपयांचा नफा कमवित आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचीही यास संमतीच असल्याचे दिसते.

रेल्वेच्या आरक्षित तिकीटांमध्ये प्रवाशांची लूट होत असल्याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाला निवेदने देण्यात आलीत; पण कुठलीही कारवाई केली जात नाही. बहुतांश रेल्वे स्थानकावरील तिकीट देणार्‍या कर्मचार्‍यांशीही दलालांचे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावरच असा प्रकार घडला. यामुळे वादही निर्माण झाला होता. पुलगाव, धामणगाव (रेल्वे), सेवाग्राम या रेल्वे स्थानकांवरही दलाल सक्रीय असून प्रवाशांची लूट होत आहे. या प्रकाराबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय व्यवस्थापक आणि मुख्य व्यववस्थापकांपर्यंंत तक्रारी करण्यात आल्यात; पण कुणीही कारवाई केली नाही. या प्रकारामुळे रेल्वेला प्रवाशांशी कसलेही देणेघेणे नसल्याचे दिसते. किमान रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापनाने तरी नागपूर विभागातील दलाल पद्धत बंद करणे अपेक्षित आहे.(कार्यालय प्रतिनिधी)