शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरूच

By admin | Updated: May 27, 2014 23:55 IST

रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत.

वर्धा : रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांद्वारे प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात असून ४00 रुपयांच्या एका तिकीटासाठी प्रवाशांना ६00 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तत्काल तिकीटांमध्येही काळाबाजार होत असल्याने प्रवाशांना तिकिटाच मिळत नसल्याचेच दिसते.

उन्हाळ्याच्या सुट्या संपत आल्या असून लग्नसराईदेखील आटोपत आहे. यामुळे नागरिकांची आपापल्या गावांकडे परतण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये रेल्वे, एसटी फुल्ल राहत असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात; पण या दोन्ही सिझनमध्ये ट्रॅव्हल्स धारकांद्वारे प्रवासी तिकीटात मोठी भाववाढ केली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. सध्या नागरिकांची आपापल्या गावी परतण्याची लगबग सुरू झाल्याने रेल्वेच्या तिकीटासाठी सक्रीय असलेल्या दलालांची लॉटरीच लागली आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना एका तिकीटमागे १00 ते ३00 रुपये आगाऊ मोजावे लागत आहेत. रेल्वेचे आरक्षित तिकीट आधीच काढून ठेवायचे असेल व त्यात कन्फर्म तिकीटाची हमी द्यायची नसेल तर दलाल प्रत्येक तिकीटावर १00 ते २00 रुपये आगाऊ आकारतात. यातील रेल्वेच्या तात्काळ आरक्षित तिकीटांसाठी कन्फर्म सिटसाठी २00 ते ४00 रुपये आगाऊ आकारले जात आहेत. यामुळे प्रवाशांना ४00 रुपयांचे तिकीट असेल तर ते तिकीट ६00 ते ८00 रुपयांमध्ये खरेदी करावे लागत आहे.

पुलगाव ते हावडा कोलकाता या प्रवासाचे साधे आरक्षित तिकीट ४८0 रुपयांचे होते. यात तात्काळ तिकीट काढल्यास सुमारे १५0 रुपये रेल्वेला अधिकचे द्यावे लागतात. याच तिकीटा दलालांकडून घेतल्यास ६३0 रुपये प्रती तिकीटाऐवजी २00 रुपये आगाऊ खर्च करून म्हणजे ८३0 ते ९00 रुपयांमध्ये घ्याव्या लागतात. यात तात्काळ आरक्षणाच्या शुल्कासह दलालाचे २00 ते ३00 रुपये अधिक मोजावे लागत असल्याने प्रवाशांचे कंबरडेच मोडले जात आहे. असाच प्रकार मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई, नवी दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणच्या तिकीटांबाबत घडत आहे. ४00 रुपयांच्या तिकीटासाठी ६00 रुपये द्यावे लागत असल्याने एका कुटुंबात जर ६ सदस्य असतील तर केवळ प्रवासासाठी त्यांना ३ हजार ६00 रुपये मोजावे लागतात. यात दलाल १२00 रुपयांचा नफा कमवित आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचीही यास संमतीच असल्याचे दिसते.

रेल्वेच्या आरक्षित तिकीटांमध्ये प्रवाशांची लूट होत असल्याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाला निवेदने देण्यात आलीत; पण कुठलीही कारवाई केली जात नाही. बहुतांश रेल्वे स्थानकावरील तिकीट देणार्‍या कर्मचार्‍यांशीही दलालांचे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावरच असा प्रकार घडला. यामुळे वादही निर्माण झाला होता. पुलगाव, धामणगाव (रेल्वे), सेवाग्राम या रेल्वे स्थानकांवरही दलाल सक्रीय असून प्रवाशांची लूट होत आहे. या प्रकाराबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय व्यवस्थापक आणि मुख्य व्यववस्थापकांपर्यंंत तक्रारी करण्यात आल्यात; पण कुणीही कारवाई केली नाही. या प्रकारामुळे रेल्वेला प्रवाशांशी कसलेही देणेघेणे नसल्याचे दिसते. किमान रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापनाने तरी नागपूर विभागातील दलाल पद्धत बंद करणे अपेक्षित आहे.(कार्यालय प्रतिनिधी)