शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नझूल लिजचा प्रश्न केवळ चर्चेपुरताच

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही.

वर्धा : जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही. यामुळे अनेक वर्षांपासून राहूटी करून असलेल्या सामान्यांना सध्या विक्री व हस्तांतरण प्रक्रियेचे आदेश नसल्याने व्यवहार रखडले आहेत. वर्धा जिल्ह्यात सुमारे पाच हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्यांची अडचण झाली आहे. शासनाने वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी तसेच धर्मदाय कारणांसाठी जमिनी भाडे पट्ट्यांवर दिल्या. १९२४-२५ पासून वर्धा जिल्ह्यातील अनेकांना अशा पद्धतीने जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या़ प्रत्येक ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केले जाते. आता २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या लिजवरील जमिनीचे नूतनीकरण होत आहे. लिज वाढविण्याची प्रक्रिया शासनाकडून केली जाते; पण कायम उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला जात नाही. यामुळे निवासी असलेले सामान्य नागरिक कात्रीत अडकले आहेत. जीवापाड जपलेले घर अद्याप आपले नाही, ही जाणीव त्यांना त्रस्त करीत आहे. याबाबत अनेकांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, पाठपुरावा केला; पण न्याय मिळाला नाही. नागपूर अनेक अधिवेशने या मुद्याने गाजविली; पण तोडगा निघाला नाही. नझुल लिजबाबत ६ जानेवारी २००३, १९ जून २००७, २७ नोव्हेंबर २००७, १० आॅक्टोबर २०१२ आणि १२ डिसेंबर २०१२ असे पाच अध्यादेश निघाले़ यानंतर २०१४ मध्ये सुधारित ेअध्यादेशही आला़ यात विक्री, हस्तांतरण करायचे असेल तर सदर जमीन भाडेपट्टीवर घेतली, तेव्हापासून कर अदा करण्याच्या सूचना आहेत़ यामुळे नागरिकांनी नांगीच टाकली़ नवीन सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे; पण या अधिवेशनात चर्चाच झाली नसल्याने तीही मावळली़ जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून शहर व जिल्ह्यातील नझूल लिजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांच्यासह नागरिकांची आहे़(कार्यालय प्रतिनिधी)