शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

नझूल लिजचा प्रश्न केवळ चर्चेपुरताच

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही.

वर्धा : जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही. यामुळे अनेक वर्षांपासून राहूटी करून असलेल्या सामान्यांना सध्या विक्री व हस्तांतरण प्रक्रियेचे आदेश नसल्याने व्यवहार रखडले आहेत. वर्धा जिल्ह्यात सुमारे पाच हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्यांची अडचण झाली आहे. शासनाने वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी तसेच धर्मदाय कारणांसाठी जमिनी भाडे पट्ट्यांवर दिल्या. १९२४-२५ पासून वर्धा जिल्ह्यातील अनेकांना अशा पद्धतीने जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या़ प्रत्येक ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केले जाते. आता २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या लिजवरील जमिनीचे नूतनीकरण होत आहे. लिज वाढविण्याची प्रक्रिया शासनाकडून केली जाते; पण कायम उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला जात नाही. यामुळे निवासी असलेले सामान्य नागरिक कात्रीत अडकले आहेत. जीवापाड जपलेले घर अद्याप आपले नाही, ही जाणीव त्यांना त्रस्त करीत आहे. याबाबत अनेकांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, पाठपुरावा केला; पण न्याय मिळाला नाही. नागपूर अनेक अधिवेशने या मुद्याने गाजविली; पण तोडगा निघाला नाही. नझुल लिजबाबत ६ जानेवारी २००३, १९ जून २००७, २७ नोव्हेंबर २००७, १० आॅक्टोबर २०१२ आणि १२ डिसेंबर २०१२ असे पाच अध्यादेश निघाले़ यानंतर २०१४ मध्ये सुधारित ेअध्यादेशही आला़ यात विक्री, हस्तांतरण करायचे असेल तर सदर जमीन भाडेपट्टीवर घेतली, तेव्हापासून कर अदा करण्याच्या सूचना आहेत़ यामुळे नागरिकांनी नांगीच टाकली़ नवीन सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे; पण या अधिवेशनात चर्चाच झाली नसल्याने तीही मावळली़ जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून शहर व जिल्ह्यातील नझूल लिजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांच्यासह नागरिकांची आहे़(कार्यालय प्रतिनिधी)