शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पांढऱ्या सोन्याची सीसीआयकडून कासवगतीने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे.

ठळक मुद्देदररोज केवळ ७०० ते ८०० क्विंटल : तर, खासगी व्यापाऱ्यांची अडीच ते तीन हजार क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : तालुक्यातील सीसीआयच्या केंद्रावर कासवगतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे पावसाळा निघणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीसीआयने रोहणा येथे कापूस खरेदी सुरू केली होती. आता रोहणा आणि खरांगणा येथील उपबाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवसांचे नियोजन असून दिवस, वार निश्चित नाही. या केंद्रावर दररोज ७०० ते ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांनी दिली.आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे. एका दिवशी केवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचाच शेतमाल खरेदी केला जात असल्याने पावसाळ्यासोबतच हिवाळा उलटून जाईल काय, अशी स्थिती आहे.खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरूचआर्वी येथे कापूस खरेदी करणारे २१ व्यापारी आहेत. तेरा जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खासगी खरेदी होत आहे. सीसीआयचा खरेदीचा ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये भाव असून खासगी व्यापारी ४ हजार ५ रुपये भाव देत आहे.आर्वी बाजार समितीचा उपक्रमकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाहेर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल घेऊन येणाºया गाड्यांचे सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण करून गाडी समितीत सोडण्यात येत आहे. या उपक्रमाचे शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी कौतुक केले आहे.जिनिंगमालक, सभापतींनी पालकमंत्र्यांना घातले साकडेआर्वी येथे सीसीआयचे केंसद्र सुरू झाल्यास एका दिवशी जवळपास १०० ते ११० शेतकºयांच्या कापसाची खरेदी होईल. शहरातील कापूस खरेदी करणारे मोठे व्यापारी सीसीआय केंद्र घेण्यास इच्छुक आहे. कापसाचे केंद्र आर्वीत देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्यासाहेब काळे, सचिव विनोद कोटेवार आणि काही जिनिंग-प्रेसिंग संचालकांनी वर्धा येथे पालकमंत्र्यांची भेट घेत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता सीसीआयचे केंद्र देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी