शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याची सीसीआयकडून कासवगतीने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे.

ठळक मुद्देदररोज केवळ ७०० ते ८०० क्विंटल : तर, खासगी व्यापाऱ्यांची अडीच ते तीन हजार क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : तालुक्यातील सीसीआयच्या केंद्रावर कासवगतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे पावसाळा निघणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीसीआयने रोहणा येथे कापूस खरेदी सुरू केली होती. आता रोहणा आणि खरांगणा येथील उपबाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवसांचे नियोजन असून दिवस, वार निश्चित नाही. या केंद्रावर दररोज ७०० ते ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांनी दिली.आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे. एका दिवशी केवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचाच शेतमाल खरेदी केला जात असल्याने पावसाळ्यासोबतच हिवाळा उलटून जाईल काय, अशी स्थिती आहे.खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरूचआर्वी येथे कापूस खरेदी करणारे २१ व्यापारी आहेत. तेरा जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खासगी खरेदी होत आहे. सीसीआयचा खरेदीचा ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये भाव असून खासगी व्यापारी ४ हजार ५ रुपये भाव देत आहे.आर्वी बाजार समितीचा उपक्रमकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाहेर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल घेऊन येणाºया गाड्यांचे सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण करून गाडी समितीत सोडण्यात येत आहे. या उपक्रमाचे शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी कौतुक केले आहे.जिनिंगमालक, सभापतींनी पालकमंत्र्यांना घातले साकडेआर्वी येथे सीसीआयचे केंसद्र सुरू झाल्यास एका दिवशी जवळपास १०० ते ११० शेतकºयांच्या कापसाची खरेदी होईल. शहरातील कापूस खरेदी करणारे मोठे व्यापारी सीसीआय केंद्र घेण्यास इच्छुक आहे. कापसाचे केंद्र आर्वीत देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्यासाहेब काळे, सचिव विनोद कोटेवार आणि काही जिनिंग-प्रेसिंग संचालकांनी वर्धा येथे पालकमंत्र्यांची भेट घेत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता सीसीआयचे केंद्र देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी