शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

औद्योगिक वसाहतीपासून पुलगावकर वंचितच

By admin | Updated: May 22, 2016 01:52 IST

मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

रोजगार मिळेणा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षपुलगाव : मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सर्वच भौगोलिक परिस्थिती उपलब्ध असताना शहरात अद्याप औद्योगिक वसाहतीची स्थापनाही होऊ शकलेली नाही. परिणामी, बेरोजगारी वाढत असून रोजगार मिळेणासा झाला आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.शहरातून नागपूर-मुंबई हा द्रुतगती मार्ग व हैद्राबाद-भोपाल हा महामार्ग तसेच धारणी ते अहेरी हा राज्य महामार्गही गेला आहे. शहरालगतच वर्धा नदी वाहत आहे. असे असताना हे शहर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिले आहे. भोसले कालीन राजवटीतून शहर व परिसराला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व होते. भोसले व इंग्रजांना या भागाचे महत्त्व कळले म्हणून त्यांनी वर्धा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधला. इंग्रज राजवटीत नागपूरच्या बुटी परिवाराला महत्त्व कळले व त्यांनी या शहरात १८८९ पुलगाव कॉटन मिल्स हा मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. यानंतर याच राजवटीत १९४२ मध्ये इंग्रजांनी केंद्रीय दारूगोळा भांडाराची निर्मिती करून पुलगाव शहराच्या विकासाची दालने खुली केली. १५ आॅगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला खरा; पण हे शहर विकासात्मक बाबतीत पाच दशकांत मागेच राहिले. नवीन उद्योग तर आले नाहीच, उलट चार हजार कामगारांना रोजगार देणारा पुलगाव कॉटन मिल हा मोठा वस्त्रोद्योग लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे एक दशकापेक्षाही अधिक वर्षापासून बंद पडला आहे. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या बी.ई.सी. फर्टिलाइझर या खत कारखान्यालाही घरघर लागली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरात मंत्री प्रविण पोटे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असताना नागरिकांनी याबाबत विचारणा केली. यावर पोटे यांनी, तुम्ही जागा द्या, मी औद्योगिक वसाहत देतो, असे म्हटले होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी अशी उत्तरे देणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागेसाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)