शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पुलगाव पालिकेत काँग्रेसला मोठा हादरा

By admin | Updated: August 26, 2015 02:06 IST

पुलगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा आणि शिवसेना एक अशा एकूण १२ नगरसेवकांनी...

घरचा अहेर : नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा व सेनेच्या १२ नगरसेवकांची आघाडी वर्धा : पुलगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा आणि शिवसेना एक अशा एकूण १२ नगरसेवकांनी एकत्र येऊन पुलगाव शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे राजकीय भूंकपच झाला आहे. याचा हादरा थेट काँग्रेसला बसला आहे.काँग्रेसचे नगराध्यक्ष मनीषकुमार साहु यांच्यासह नगरसेवक राजीव बतरा, स्मिता चव्हाण, सुनील ब्राम्हणकर, अर्चना राऊत व भाजप नगरसेवक विमल चंदेल, रंजना कडू, कल्पना परतेकी, सोनाली गायधने, राजकुमार गुजर व संजय गाते, तर शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री बरडे यांचा आघाडीमध्ये समावेश आहे. सुमारे तीन महिन्यांपासून पुलगाव पालिकेचे नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यावर काँग्रेस गटनेत्यासह काही नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला धुडकावत अविश्वास आणण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या विकास कामात व पुलगाव शहराच्या विकासाच्या कामाला खीळ बसली होती, असा आरोप सदर बाराही नगरसेवकांनी केला आहे.ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे चार, भाजपाचे पाच, शिवसेनेच्या एक व दोन स्वीकृत सदस्यांनी अध्यक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने मंगळवारी पालिकेत उपरोक्त सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, भाजप व शिवसेना पुरस्कृत पुलगाव शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यानंतर या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या पुढे नगराध्यक्ष हे या आघाडीचेच असल्याचे संबोधले जाईल व आघाडीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याची घोषणा एका जाहीर पत्रकाद्वारे केली आहे. पुलगाव नगर पालिकेत एकूण १९ नगरसेवक असून दोन स्वीकृत सदस्य आहे. यामध्ये काँग्रेस-१०, भाजप-५, सेना-१, अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. उपरोक्त आघाडीत नगराध्यक्षासह काँग्रेसचे पाच सदस्य सहभागी झाल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, देवळी-पुलगाव मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व असताना पुलगाव पालिकेतील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)यापुढे नगराध्यक्षही आघाडीचाच संबोधणारया १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आघाडी स्थापन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यापुढे नगराध्यक्ष हे या आघाडीचेच असल्याचे संबोधल्या जाईल व आघाडीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याची घोषणा एका जाहीर पत्रकाद्वारे केली आहे.