शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

प्रबोधनाकरिता जनजागृती रॅली

By admin | Updated: May 19, 2014 23:50 IST

जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख,

वर्धा : जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख, वडगाव (जं.), शिवणगाव, मेनखत, वडगाव (खु.), वडगाव (कला), जुवाडी, धानोली (गावंडे), नानबर्डी, अंतरगाव, जुनगड येथे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ शिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या आंदोलनाची माहिती देण्यात आली. ‘बुद्धं शरणम गच्छामी’ हा अद्यावत संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच दिला. तो संदेश आज अधिक उपयुक्त असल्याचे आपल्याला जाणवत आहे. समाजात समता विकसित करण्यासाठी स्वतंत्र चिंतनाची गरज आहे. बुद्धीच्या प्रगल्भतेशिवाय ते शक्य नाही़ म्हणून बहुसंख्येचे बुद्धी व विज्ञाननिष्ठ व्यापक समाजमन झाले तरच मानवी मुल्यांची प्रतिष्ठापना होईल, असे मत किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी व्यक्त केले. ज्यांचे प्रश्न कुणीही सोडवत नव्हते, ते प्रश्न सोडविण्याचा व राजकारणाचा काही संबंध नाही, असे म्हणणार्‍या तथाकथित नेतागिरी करणार्‍यांसमोर आव्हान उभारत आहोत. यापूढे केवळ पक्ष, नेता, जात, धर्म, पैसा या सामान्य आमिषाला बळी पडणार्‍या समाजाने लायकी नसणार्‍यांना त्यांची जागा दाखवावी. ज्यांना विचारांची व विकासाची दृष्टी आहे, प्रश्न सोडविण्याची तळमळ आहे, अशा प्रज्ञावंत, बुद्धीनिष्ठ, कार्यनिष्ठ, व्यक्तींनाच लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे़ तरच तुम्ही उज्वल भविष्याची अपेक्षा करू शकता, असेही त्यांनी सांगितले़ जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी संघटीत होऊन प्रश्न सोडविला जाऊ शकतो. यामुळे संघटनेच्या शक्तीला बळ द्या व आपले प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. वर्धा तालुकाध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सभेला तुकाराम पुसाम, मधुकर धवणे, विजय भांडेकर, माणिक पंधराम, विनोद उरकुडे, श्रीकांत गावंडे, वंदना मून, निर्मला वाघ, संजय मसराम, प्रकाश करनाके, विकास उमाटे, किशोर पाटील, एकनाथ येळणे, मनोहर भांडेकर, अनिल टेकाम, संजय मसराम, अमीत वानखेडे, गोविंद कुमरे, लक्ष्मण ठाकरे, सुरेश नेहारे, मधुकर कुकडे, सिद्धार्थ मानकर, राजेंद्र उडाण, गंगाधर येलोरे, सुनील पिंपरे, सुनीता वैरागडे, कमला उईके, अर्चना चलाख, अरुण वैरागडे आदी उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)