शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता व पाणीपट्टी करापोटी थकले १.०८ कोटी

By admin | Updated: March 19, 2017 01:01 IST

शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत.

थकबाकीदारांवर नगरपंचायत उगारणार वसुलीचा बडगा कारंजा (घा.) : शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत. या नागरिकांकडे गत वर्षाची एकत्रीत कर थकबाकी १५ लाख रुपये आहे. तर यावर्षीच्या मालमत्ता कराची मागणी ६८ लाख ६८ हजार ८१२ तर पानीपट्टी कराची मागणी २४ लाख ६५ हजार ९०५ रुपये असे एकूण १ कोटी ८ लाख रुपये थकले आहेत. या थकबाकीकरिता नगरपंचायतीच्यावतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आतापर्यंत २५ लाख ६५ हजार रुपयांच्या मालमत्ता कराची व १६ लाख ५५ हजार रुपयांच्या पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. या वसुलीनंतरही ६८ लाख रुपयांची कर वसुली नागरिकांकडे थकली आहे. शहराच्या विकासासाठी फंड उपलब्ध करण्याच्या हेतूने कारंजा नगरपंचायततर्फे शासनाच्या आदेशानुसार थकीत कर वसुल करण्याच्या हेतूने विशेष मोहीम राबविणे सुरू आहे. आतापर्यंत अनेक सूचना देवूनही थकबाकीदारांनी कर भरला नसल्याने विशेष पथक नेमण्यात आले आहे. वसुलीसंदर्भात कडक धोरण स्वीकारून थकीत कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव सुध्दा करण्यात येईल अशी माहिती कारंजा नगर पंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली आहे. थकबाकी वसुली मोहिमेची सुरुवात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या गाळ्यांपासून केली. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार गाळेमालकांच्या दुकानांन कुलूप ठोकण्यात आले आहे. वारंवार सुचना देवून पाणी कर न भरणाऱ्यांचे नळ बंद करण्यात आले आहे. यावरही नागरिकांकडून विशेष सहाकार्य मिळत नसल्याने शेवटी नगरपंचायतने नगरपरिषद कायदा १९६५ च्या कलम १५२ नुसार थकीत वसुलीसाठी अधीसूचना काढण्याचा निर्णय घेतला आहे. या अधीसूचनेनुसार प्रथम कर थकबाकीदारांची मालमत्ता नियमानुसार जप्त केली जाईल. त्यानंतर ही रक्कम न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल. लिलावात कोणी भाग न घेतल्यास ती मालमत्ता नाममात्र दरात नगरपंचायत स्वत:च्या नावे करणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागिरकांकडून कराचा भरणा होत नसल्याने नगर पंचायतीची तिजोरी खाली आहे. यामुळे शहरात विकास कामे करणे अवघड झाले आहे. तिजोरी खाली असल्याने अनेक कामांचा खोळबा झाला आहे. याचा विचार नागरिकांनीच करणे गरजेचे आहे. त्याच्याकडून कर आल्यास निधी उभा होईल आणि कामे होतील असे मुख्याधिकारी राऊत म्हणाल्या.