शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

मालमत्ता व पाणीपट्टी करापोटी थकले १.०८ कोटी

By admin | Updated: March 19, 2017 01:01 IST

शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत.

थकबाकीदारांवर नगरपंचायत उगारणार वसुलीचा बडगा कारंजा (घा.) : शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत. या नागरिकांकडे गत वर्षाची एकत्रीत कर थकबाकी १५ लाख रुपये आहे. तर यावर्षीच्या मालमत्ता कराची मागणी ६८ लाख ६८ हजार ८१२ तर पानीपट्टी कराची मागणी २४ लाख ६५ हजार ९०५ रुपये असे एकूण १ कोटी ८ लाख रुपये थकले आहेत. या थकबाकीकरिता नगरपंचायतीच्यावतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आतापर्यंत २५ लाख ६५ हजार रुपयांच्या मालमत्ता कराची व १६ लाख ५५ हजार रुपयांच्या पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. या वसुलीनंतरही ६८ लाख रुपयांची कर वसुली नागरिकांकडे थकली आहे. शहराच्या विकासासाठी फंड उपलब्ध करण्याच्या हेतूने कारंजा नगरपंचायततर्फे शासनाच्या आदेशानुसार थकीत कर वसुल करण्याच्या हेतूने विशेष मोहीम राबविणे सुरू आहे. आतापर्यंत अनेक सूचना देवूनही थकबाकीदारांनी कर भरला नसल्याने विशेष पथक नेमण्यात आले आहे. वसुलीसंदर्भात कडक धोरण स्वीकारून थकीत कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव सुध्दा करण्यात येईल अशी माहिती कारंजा नगर पंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली आहे. थकबाकी वसुली मोहिमेची सुरुवात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या गाळ्यांपासून केली. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार गाळेमालकांच्या दुकानांन कुलूप ठोकण्यात आले आहे. वारंवार सुचना देवून पाणी कर न भरणाऱ्यांचे नळ बंद करण्यात आले आहे. यावरही नागरिकांकडून विशेष सहाकार्य मिळत नसल्याने शेवटी नगरपंचायतने नगरपरिषद कायदा १९६५ च्या कलम १५२ नुसार थकीत वसुलीसाठी अधीसूचना काढण्याचा निर्णय घेतला आहे. या अधीसूचनेनुसार प्रथम कर थकबाकीदारांची मालमत्ता नियमानुसार जप्त केली जाईल. त्यानंतर ही रक्कम न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल. लिलावात कोणी भाग न घेतल्यास ती मालमत्ता नाममात्र दरात नगरपंचायत स्वत:च्या नावे करणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागिरकांकडून कराचा भरणा होत नसल्याने नगर पंचायतीची तिजोरी खाली आहे. यामुळे शहरात विकास कामे करणे अवघड झाले आहे. तिजोरी खाली असल्याने अनेक कामांचा खोळबा झाला आहे. याचा विचार नागरिकांनीच करणे गरजेचे आहे. त्याच्याकडून कर आल्यास निधी उभा होईल आणि कामे होतील असे मुख्याधिकारी राऊत म्हणाल्या.