शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

मान्सूनच्या लांबणीने बियाणे बाजारावर अवकळा

By admin | Updated: July 5, 2014 23:44 IST

पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे.

वर्धा : पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी हजारो टन खत व बी भरून ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बियाणे व खताची विक्री सध्या थांबली आहे. मान्सून लांबल्यामुळे पिकांची पेरणीची वेळही आता बदलणार आहे. यामुळे आता या बियाण्यांचे काय करायचे असा प्रश्न विके्रत्यांसमोर उभा ठाकला आहे.दर वर्षी सरासरी जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास ७० टक्के पेरणी पूर्ण होत असते. पेरणीसाठी लागणारे बियाण्यांची बुकींग व्यापारी दिवाळीच्या नंतर लगेच करून ठेवतात. त्यानुसार त्यांना माल उपलब्ध होतो. पावसाळ्यात माल कमी पडू नये म्हणून काळजी घेतलेली असते. तेव्हापासून व्यापाऱ्यांचा पैसा कंपन्याकडे जमा असतो. साधारण मे महिन्याच्या मध्यापासून शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत असतात. कारण नंतर बियाण्यांचे भाव अचानक वाढवले जातात, तर कधी खताचा तुटवडा जाणवतो. त्यआमुळे शेतकरी आधीच बियाणे खरेदी करतात. मात्र यंदा जुलैच्या मध्यापर्यंतही जिल्ह्यात पेरणी पूर्णपणे आटोपणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळे शेतकरी वर्गासोबतच व्यापारी वर्गही चिंतेत अडकला आहे. एकंदरीत बियाण्याच्या व खताच्या खरेदीमध्ये अडकलेले हजारो कोटीचे व्यवहारही थांबले आहेत. बाजारातही मंदीचे सावट निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी बियाणे विक्रीसाठी घेतले तरी शेतकरी बियाणे घेण्यासाठी तयार नाहीत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी खत व बियाण्यामध्ये केलेली हजारो कोटी रूपयाची गुंतवणूक आता डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस नसल्यामुळे पेरणीला सुरूवात झाली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे वेळ आली आहे.(शहर प्रतिनिधी)