शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार

By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

शासनस्तरावर दखल : संबंधित यंत्रणेला आदेशहिंगणघाट : पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लोअरवणा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. १९९२-९३ पासून या प्रकल्पातील पाण्याने शेतात सिंचन केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शेतांना या प्रकल्पातील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होते. परंतु डाव्या कालव्याला अस्तरीकरण नसल्याने साधारणत: ६० टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र घट निर्माण झाली आहे.याचा सिंचनावर विपरित परिणाम होवू नये म्हणून मिहानच्या वतीने २००७-०८ मध्ये कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, परंतु तत्कालीन शासनाने हा निधी कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता न वापरता इतरत्र वळविल्याची तक्रार नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या वडगाव धरणातून नागपूर येथे मिहान प्रकल्पाला सुद्धा पाणी दिल्या जाते. अस्तरीकरण न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अस्तरीकरण केल्यास पाण्याचा अपव्यय थांबून शिवारातील शेतीला सिंचन होऊ शकते. तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सध्या पाण्याच्या एका आवर्तनाला एक महिना लागतो. तो कालावधी पाण्याची बचत झाल्याने पंधरवाड्यावर येईल. तसेच सध्या होत असलेली सिंचनाची तीन ते चार अवर्तने वाढून ती पाच-सहा होतील, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. कालव्यांचे अस्तरीकरण होणार असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबणार असून सिंचनाला फायदा होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)