शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार

By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

शासनस्तरावर दखल : संबंधित यंत्रणेला आदेशहिंगणघाट : पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लोअरवणा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. १९९२-९३ पासून या प्रकल्पातील पाण्याने शेतात सिंचन केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शेतांना या प्रकल्पातील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होते. परंतु डाव्या कालव्याला अस्तरीकरण नसल्याने साधारणत: ६० टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र घट निर्माण झाली आहे.याचा सिंचनावर विपरित परिणाम होवू नये म्हणून मिहानच्या वतीने २००७-०८ मध्ये कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, परंतु तत्कालीन शासनाने हा निधी कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता न वापरता इतरत्र वळविल्याची तक्रार नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या वडगाव धरणातून नागपूर येथे मिहान प्रकल्पाला सुद्धा पाणी दिल्या जाते. अस्तरीकरण न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अस्तरीकरण केल्यास पाण्याचा अपव्यय थांबून शिवारातील शेतीला सिंचन होऊ शकते. तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सध्या पाण्याच्या एका आवर्तनाला एक महिना लागतो. तो कालावधी पाण्याची बचत झाल्याने पंधरवाड्यावर येईल. तसेच सध्या होत असलेली सिंचनाची तीन ते चार अवर्तने वाढून ती पाच-सहा होतील, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. कालव्यांचे अस्तरीकरण होणार असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबणार असून सिंचनाला फायदा होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)