शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार

By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

शासनस्तरावर दखल : संबंधित यंत्रणेला आदेशहिंगणघाट : पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लोअरवणा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. १९९२-९३ पासून या प्रकल्पातील पाण्याने शेतात सिंचन केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शेतांना या प्रकल्पातील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होते. परंतु डाव्या कालव्याला अस्तरीकरण नसल्याने साधारणत: ६० टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र घट निर्माण झाली आहे.याचा सिंचनावर विपरित परिणाम होवू नये म्हणून मिहानच्या वतीने २००७-०८ मध्ये कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, परंतु तत्कालीन शासनाने हा निधी कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता न वापरता इतरत्र वळविल्याची तक्रार नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या वडगाव धरणातून नागपूर येथे मिहान प्रकल्पाला सुद्धा पाणी दिल्या जाते. अस्तरीकरण न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अस्तरीकरण केल्यास पाण्याचा अपव्यय थांबून शिवारातील शेतीला सिंचन होऊ शकते. तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सध्या पाण्याच्या एका आवर्तनाला एक महिना लागतो. तो कालावधी पाण्याची बचत झाल्याने पंधरवाड्यावर येईल. तसेच सध्या होत असलेली सिंचनाची तीन ते चार अवर्तने वाढून ती पाच-सहा होतील, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. कालव्यांचे अस्तरीकरण होणार असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबणार असून सिंचनाला फायदा होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)