शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

गिरडमध्ये सेंद्रिय कापसापासून होणार पेळूनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

गांधीवादी मगन संग्रहालयात सेंद्रिय कापूस ते खादीनिर्मिती असा प्रवास होतो. गिरड येथे सेंद्रिय कापसावर प्रक्रियेअंती पेळू तयार केले जाणार आहेत. देशी कापसापासून निर्मित या पेळूवर वर्ध्याच्या मगन संग्रहालयात प्रक्रिया केली जाते. सेंद्रिय कापसावर प्रथम जिनिंग प्रक्रिया करून पेळू निर्माण केला जाईल.

ठळक मुद्देपहिले प्रक्रिया केंद्र : कापूस उत्पादकांना हक्काची बाजारपेठ

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीच्या समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील नैसर्गिक शेती विकास केंद्रात सेंद्रिय कापूस प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील हे पहिलेच केंद्र असून येथे देशी कापूस उत्पादनापासून पेळूची निर्मिती होणार असल्याने वर्धा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.गांधीवादी मगन संग्रहालयात सेंद्रिय कापूस ते खादीनिर्मिती असा प्रवास होतो. गिरड येथे सेंद्रिय कापसावर प्रक्रियेअंती पेळू तयार केले जाणार आहेत. देशी कापसापासून निर्मित या पेळूवर वर्ध्याच्या मगन संग्रहालयात प्रक्रिया केली जाते. सेंद्रिय कापसावर प्रथम जिनिंग प्रक्रिया करून पेळू निर्माण केला जाईल. या पेळूपासून सौर ऊर्जेवरील अंबर चरख्याच्या माध्यमातून धागा तयार करणे, नैसर्गिक रंगांनी रंगाईकाम, या धाग्यांचे कोन (रीळ) तयार करणे आणि निटिंग युनिटमध्ये कापड तयार करणे असा खादीनिर्मितीचा प्रवास आहे. मगन संग्रहालय समितीने समुद्रपूर तालुक्यात २००७ पासून नैसर्गिक शेतीची चळवळ उभारली आहे. हजारावर शेतकरी या चळवळीशी जुळले असून देशी पिकांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतात. देशी कापूस उत्पादनाकडे परिसरातील शेतकऱ्यांचा विशेष कल आहे. नैसर्गिक कापूस उत्पादक मंडळात शेकडो शेतकरी सहभागी असून सेंद्रिय कापसाचे मूल्यसंवर्धन होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रावर सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली हळद, डाळ, मसाले, गहू ज्वारी आदी उत्पादनांवर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री कार्यान्वित आहे. याशिवाय शेतकºयांना गरजेनुसार सुविधा पुरविल्या जातात. परिसरातील शेकडो गावातील २५ हजार शेतकरी सुविधा घेत आहेत. आता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर या केंद्रात प्रक्रिया केली जात आहे. मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता सेंद्रिय खादी निर्मितीसाठी प्रयत्नरत आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादित केल्यावर बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची अडचण भासत होती. आता नैसर्गिक शेतीतून कापूस उत्पादन आणि खादी निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांना या अभिनव केंद्राच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.- गजानन गारघाटे, प्रमुख,नैसर्गिक शेती विकास केंद्र,गिरड.

टॅग्स :cottonकापूस